शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा व्यवसायातील गुन्हेगारी मोडून काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “शहरात रिक्षाचालकांकडून एका पाठोपाठ एक गुन्हे घडले आहेत. त्यातील आरोपींना पोलिसांनी तातडीने पकडले. रिक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “शहरात रिक्षाचालकांकडून एका पाठोपाठ एक गुन्हे घडले आहेत. त्यातील आरोपींना पोलिसांनी तातडीने पकडले. रिक्षा व्यवसायात काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक शिरले आहेत. या गुन्हेगारांचा बीमोड करण्यासाठी पावले उचलणार आहे. याचा प्रत्यय आपल्याला लवकरच येईल. रेल्वे, एसटी, आरटीओ, ट्रॅॅफिक पोलीस, महापालिका, पीएमपी अशा सर्व प्रमुख घटकांशी समन्वयाने दीर्घकालीन उपाय योजना आखणार आहे,” असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. गुप्ता म्हणाले की, महिलांची सुरक्षितता आणि दहशतवाद्यांचा बीमोड याला पोलिसांनी महत्त्व दिले आहे. प्रवासाशी संबंधित ठिकाणांबाबत एसटी, आरटीओ, वाहतूक पोलीस आणि महापालिका अशा वेगवेगळ्या घटकांचा संबंध असतो. या सर्व घटकांशी मी स्वत: संपर्क साधत आहे. गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील दुर्दैवी घटना रोखण्यासाठी या सर्व घटकांशी समन्वय साधून दीर्घकालीन उपाय योजना राबविण्यात येणार आहे.

“सध्या तातडीने आरटीओ व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांची तपासणी सुरू केली आहे. शहरात अनेक ठिकाणी निर्जन स्थळे आहेत. अशा ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटेल आणि गुन्हेगारांना संधी मिळू नये, यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यापासून अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत,” असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजित तांबडे यांनी स्वागत केले. नवनाथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

मुंबईपेक्षा पुण्यात दंडात्मक कारवाई अधिक

वाहतूक पोलीस नियमनाऐवजी दंडात्मक कारवाईवर अधिक भर देतात, असे विचारले असता आयुक्त गुप्ता म्हणाले, “कोरोनाच्या काळात मुंबईपेक्षा पुणे पोलिसांनी अधिक कारवाई केली आहे. तब्बल ९० कोटी रुपयांची दंड आकारणी झाली. त्यामुळेच पुण्यात नागरिक मास्कचा वापर अधिक करू लागले व कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आले.”

चौकट

‘मेरी नजर में आया तो खतम’

गुन्हेगारांवरील कारवाईबाबत गुप्ता म्हणाले, “छोटे-मोठे गुंड तलवारी, कोयते घेऊन केक कापणे, हिंसक स्टेटस ठेवून दहशत पसरवत होते. समाजातले वातावरण कोणी बिघडवत असेल तर ते खपवून घेणार नाही. अशा गुंडांना शोधून कारवाई केली. गुंडांचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्यावर एमपीडीए, मोक्का अशा कारवाई करून गुन्हेगारी मोडण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील वर्षभराच्या कार्याबाबत आपण समाधानी असून अजून काम करायचे आहे.”