शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

रिक्षा व्यवसायातील गुन्हेगारी मोडून काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “शहरात रिक्षाचालकांकडून एका पाठोपाठ एक गुन्हे घडले आहेत. त्यातील आरोपींना पोलिसांनी तातडीने पकडले. रिक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “शहरात रिक्षाचालकांकडून एका पाठोपाठ एक गुन्हे घडले आहेत. त्यातील आरोपींना पोलिसांनी तातडीने पकडले. रिक्षा व्यवसायात काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक शिरले आहेत. या गुन्हेगारांचा बीमोड करण्यासाठी पावले उचलणार आहे. याचा प्रत्यय आपल्याला लवकरच येईल. रेल्वे, एसटी, आरटीओ, ट्रॅॅफिक पोलीस, महापालिका, पीएमपी अशा सर्व प्रमुख घटकांशी समन्वयाने दीर्घकालीन उपाय योजना आखणार आहे,” असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. गुप्ता म्हणाले की, महिलांची सुरक्षितता आणि दहशतवाद्यांचा बीमोड याला पोलिसांनी महत्त्व दिले आहे. प्रवासाशी संबंधित ठिकाणांबाबत एसटी, आरटीओ, वाहतूक पोलीस आणि महापालिका अशा वेगवेगळ्या घटकांचा संबंध असतो. या सर्व घटकांशी मी स्वत: संपर्क साधत आहे. गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील दुर्दैवी घटना रोखण्यासाठी या सर्व घटकांशी समन्वय साधून दीर्घकालीन उपाय योजना राबविण्यात येणार आहे.

“सध्या तातडीने आरटीओ व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांची तपासणी सुरू केली आहे. शहरात अनेक ठिकाणी निर्जन स्थळे आहेत. अशा ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटेल आणि गुन्हेगारांना संधी मिळू नये, यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यापासून अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत,” असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजित तांबडे यांनी स्वागत केले. नवनाथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

मुंबईपेक्षा पुण्यात दंडात्मक कारवाई अधिक

वाहतूक पोलीस नियमनाऐवजी दंडात्मक कारवाईवर अधिक भर देतात, असे विचारले असता आयुक्त गुप्ता म्हणाले, “कोरोनाच्या काळात मुंबईपेक्षा पुणे पोलिसांनी अधिक कारवाई केली आहे. तब्बल ९० कोटी रुपयांची दंड आकारणी झाली. त्यामुळेच पुण्यात नागरिक मास्कचा वापर अधिक करू लागले व कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आले.”

चौकट

‘मेरी नजर में आया तो खतम’

गुन्हेगारांवरील कारवाईबाबत गुप्ता म्हणाले, “छोटे-मोठे गुंड तलवारी, कोयते घेऊन केक कापणे, हिंसक स्टेटस ठेवून दहशत पसरवत होते. समाजातले वातावरण कोणी बिघडवत असेल तर ते खपवून घेणार नाही. अशा गुंडांना शोधून कारवाई केली. गुंडांचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्यावर एमपीडीए, मोक्का अशा कारवाई करून गुन्हेगारी मोडण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील वर्षभराच्या कार्याबाबत आपण समाधानी असून अजून काम करायचे आहे.”