शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

भात कापणीच्या कामाला वेग

By admin | Updated: October 26, 2015 01:52 IST

भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील हळव्या जातीच्या भातपिकाच्या कापणीच्या कामाला वेग आला आहे. काही ठिकाणी कापणी केलेल्या भातपिकांचे खळ्यावर आणून झोडणी करण्याचे

भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील हळव्या जातीच्या भातपिकाच्या कापणीच्या कामाला वेग आला आहे. काही ठिकाणी कापणी केलेल्या भातपिकांचे खळ्यावर आणून झोडणी करण्याचे आणि काही ठिकाणी उडव रचून ठेवण्याचे काम सध्या जोरात सुरूआहे. प्रत्येक शेतकऱ्यांचे काम सुरूअसल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळ वाफेवर भाताची पेरणी केली जाते. आणि जून महिन्यात पाऊस झाला की भाताची रोपे चांगली उगवून येतात. मात्र, या वेळी मागील वर्षीच्या तुलनेत फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भातरोपांची उगवण उशिराने झाल्याने पर्यायाने लागवडही उशिराने झाली. लागवडीनंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने काही ठिकाणची भाताची रोपे करपली तर काही ठिकाणी दाणा भरलाच नाही. पळंज तयार झाले. त्यामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगतात.तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या रत्नागिरी २४, कर्जत १८४, कोळंबा, वरंगळ या कमी पाण्यावर साधारणपणे ९० ते १०० दिवसांत येणाऱ्या हळव्या जातीच्या भाताची कापणी सुरू आहे. भाताच्या कापणीचा दर १०० रोज व एकवेळ जेवण इतका आहे. हिर्डोशी, शिंद-महुडे खोऱ्याला भातपिकाचे आगार मानले जाते. तालुक्यातील एकूण ७४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक लागवड या भागात करण्यात येते. या वेळी पावसाअभावी साधारणपणे ६४०० म्हणजे ९० टक्केच लागवड पूर्ण झाली आहे. त्यातील भाताची पडझड होऊन नुकसान झाले, तर अवेळी पावसाने दाणा भरला नसल्याने व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भाताच्या उत्पादनात ५० टक्के घट होण्याची शक्यता असल्याचे दत्तात्रय परखांदे या शेतकऱ्याने सांगितले.