शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

पुरस्कारांचे मापदंड पुन्हा अभ्यासले जावेत

By admin | Updated: March 8, 2016 01:22 IST

एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यास त्याचे फक्त अभिनंदन केले जाते. त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाबाबत मात्र कोणी काहीच सांगत नाही.

पुणे : एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यास त्याचे फक्त अभिनंदन केले जाते. त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाबाबत मात्र कोणी काहीच सांगत नाही. साहित्यविषयक पुरस्कारांचे मापदंड पुन्हा अभ्यासले जाण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.अक्षरधारा बुक गॅलरीने पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे स्वतंत्र दालन केले आहे. या दालनाचा शुभारंभ श्याम मनोहर यांच्या हस्ते झाला. त्यानंतर प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्याशी मुक्तसंवाद साधला. मनोहर म्हणाले, की लेखकांना पुरस्कार न मिळाल्याचे दु:ख होत नाही, तर फक्त राजकारण झाल्याचे सांगून टीका करावीशी वाटते. पण, एखाद्याला पुरस्कार मिळाल्यावर या भावना, टीका दिसत नाहीत. वाचकांना सोबत घेऊन पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे ‘लोक सर्वेक्षण’ करता आल्यास ग्रंथांची गुणवत्ता, वाचकांचे अभिप्राय समजून घेणे शक्य होईल. यातून लेखकाला आपल्या लिखाणातल्या उणिवा लक्षात येतील. लेखक या नात्याने पोषक आणि अनुकूल वातावरण सध्या आपल्याकडे नसल्याचे सांगून मनोहर म्हणाले, की सध्याच्या वातावरणात माणूस कुटुबांत, समाजात, मित्रमंडळींमध्ये काय आहे? समाजाचं, जगण्याचं, भाषेचं मोल त्याच्या आयुष्यात काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून, भारतीय म्हणून त्याचं काय संचित आहे, ही इतकी उतरंड माझ्या मनात कायम असते. त्या अंगाने मी कथा, कादंबऱ्यांचे लिखाण करीत असतो. समाजाचं ज्ञानक्षेत्र आपल्याकडे अजून विकास पावत नाहीय,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)