शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

‘उजळणी’ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दस्ताऐवज : डॉ. सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:12 IST

पुणे : ‘उजळणी’ हे एक वेगळ्या धाटणीचे आत्मचरित्र असले तरी ते केवळ व्यक्तीचरित्र नाही तर यात महाराष्ट्राचा इतिहासही सामावलेला ...

पुणे : ‘उजळणी’ हे एक वेगळ्या धाटणीचे आत्मचरित्र असले तरी ते केवळ व्यक्तीचरित्र नाही तर यात महाराष्ट्राचा इतिहासही सामावलेला आहे. एका अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या ‘गुंफिरा’ कथासंग्रह आणि ‘उजळणी’ या आत्मचरित्रपर ललित लेखन अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी प्राध्यापिका रूपाली शिंदे, प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी आदी उपस्थित होते. रोहन प्रकाशनाच्या संपादिका नीता कुलकर्णी यांनी ‘गुंफिरा’ पुस्तकातील एका कथेचे वाचन केले.

डॉ. मोरे म्हणाले, डॉ. माधवी वैद्य यांच्या जगण्यात एक नजाकत तितकाच ठामपणा आहे. ‘ठामपणा’ हा फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हे. यामध्ये महिलांच्या जगण्याचे आणि उजळण्याचे सार्थक आहे. आजच्या काळात लोकांना संस्थाने काय आहे हे माहिती नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पटवर्धन कुटुंबाचे महत्त्व मोठे आहे. हाच कुटुंबाचा वारसा डॉ. वैद्य यांना लाभला. त्यांच्या 'उजळणी' या आत्मचरित्रात महाराष्ट्राचा भाग दिसतो. पुण्याचा इतिहास लिहिताना डॉ. वैद्य यांचे नाव आवर्जून घेतले जाईल.

मनीषा साठे म्हणाले, गुंफिरा म्हणजे गुंता. हाच गुंता एक एक धागा घेऊन सकारात्मकपणे सोडविला तर तो नक्कीच सुटतो. या पुस्तकात त्यांनी अनेक विषयांची बांधणी केली आहे. आयुष्यात आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. यातले प्रसंग, व्यक्तिरेखा आणि संवाद प्रकर्षाने मनाला भिडले.

डॉ. माधवी वैद्य यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका मांडली. ‘गुंफिरा’ हे पुस्तक मैत्रिणीच्या स्मृतीला समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

रुपाली शिंदे यांनी दोन्ही पुस्तकांबद्दल मनोगत व्यक्त केले. बीणा जोशी यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.