शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

By admin | Updated: February 22, 2017 02:21 IST

हवेली तालुक्यातील १३ जिल्हा परिषद गट व २६ पंचायत समिती गणांत किरकोळ बाचाबाचीचे अपवाद

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील १३ जिल्हा परिषद गट व २६ पंचायत समिती गणांत किरकोळ बाचाबाचीचे अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. हवेलीतील एकूण ५८ टक्के मतदान झाल्याची माहिती हवेलीचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.या वेळी प्रचारासाठी उमेदवारांना फक्त सहा दिवस मिळाल्याने त्यांना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. या सहा दिवसांतील प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने उत्तरोत्तर रंगतदार होत गेलेल्या या निवडणूक प्रक्रियेत आज मतदारराजाने आपले अमूल्य मत आज मतदान यंत्रात बंद केले. निवडणूक आयोगाने मतदान स्लिपा वाटण्याचे काम दिलेल्यांनी त्या बहुसंख्य ठिकाणी त्या वितरीत न केल्याने अनेक मतदार आपले मतदान कोठे आहे? याची विचारणा करताना दिसत होते. प्रत्येक पक्षाचे बुथवरील कार्यकर्ते मोबाईल अ‍ॅपवरून त्यांचा मतदार यादी व मतदान क्रमांक लिहून देत असताना दिसत होते. अनेकांची नावे मतदार यादीत नसणे, तसेच मतदान दुसऱ्या गणात असणे, असे प्रकार झाल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे आपले हक्काचे मतदार मतदान करू शकले नाहीत, याची रूखरूख अनेक उमेदवारांनी बोलून दाखवली.जास्तीत जास्त मतदान आपल्यालाच मिळावे, म्हणून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्व पक्षासह अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळपासूनच धावपळ करत होते. यांसाठी खाजगी गाड्यांचा वापर करण्यात आला. कायम उपेक्षीत असलेले अपंग व वृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी चढाओढ लागली होती. बहुतांश ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढती होत आहेत. (वार्ताहर)नवतरुण मतदारांची संख्या वाढलीलोणीकंद : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पेरणे-वाडेबोल्हाई गटामध्ये मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. विशेषत: नव्याने मतदान करीत असलेल्या तरुणांमध्ये प्रचंड उत्साह होता.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांचा हा बालेकिल्ला. त्यांचे खंदे समर्थक सुभाष जगताप यांच्या पत्नी सौ. कल्पना सुभाष जगताप यांना रिंगणात उतरवले, तर विरोधी आघाडीवर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप भोंडवे यांच्या पत्नी जयश्री संदीप भोंडवे यांच्या उमेदवारीने सर्व पक्षातील विरोधक एकवटले आहेत. या चुरशीच्या लढतीची उत्सुकता मतदानापर्यंत दिसून येत होती. लोणीकंद केंद्रावर सकाळी ७.३० वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी मतदान केले. ३७७ नंबरच्या बूथवर सकाळी ९.३० वाजता ७.८४ टक्के मतदान झाले, तर १०.३० वाजता ४८०० मतांपैकी ८९१ मतदान झाले. केसनंद येथे सकाळी ७ वाजता कामगारवर्गाने गर्दी केली होती. दुपारी काही काळ सोडता दिवसभर रांगा होत्या. सकाळी १०.३० पर्यंत १२.१४ टक्के मतदान झाले,अशीच परिस्थिती बकोरी, पेरणे, डोंगरगाव, बुरकेगाव, फुलगाव, वढू, तुळापूर या गावांमध्ये होती. हवेलीत ३० संवेदनशील केंद्रे४जिल्ह्यातील सर्वांत जास्त ३० संवेदनशील मतदान केंद्रे हवेली तालुक्यात असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने १ उपविभागीय पोलीस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, १६ सहायक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, २८७ पोलीस कर्मचारी, १४० होमगार्ड यांच्यासमवेत प्रत्येकी एक जलद प्रतिकार पथक व एसआरपीएफचे प्लाटून असा बंदोबस्त लावण्यात आल्याने कसलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.