शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

निकाल अन् अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पहिली ते थेट अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पहिली ते थेट अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या राज्य मंडळाच्या शाळांमधील शिक्षकांची निकाल तयार करण्याची धावपळीत सुरू असून सीबीएसई व इतर बोर्डाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नियमित ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. तर राज्य मंडळाच्या शाळांचे ऑनलाइन वर्ग येत्या जून महिन्यात सुरू होतील, असे शिक्षण विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा अनेक महिने बंद होत्या. कोरोना परिस्थिती सुधारल्यामुळे काही जिल्ह्यांमधील प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळा काही दिवस सुरू झाल्या. परंतु, वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे पुन्हा राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आर्थिक परिस्थिती आणि नेटवर्क कनेक्टिविटी आदी कारणांमुळे सर्वांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे शासनाने इयत्ता पहिली ते आठवी आणि त्यानंतर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्ग उन्नती देण्याचा निर्णय घेतला. तसेच आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, आपला अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शिक्षकांनी आता तो पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, परीक्षा घेतल्या जाणार नसल्याने विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाबाबत गांभीर्य नसल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे. तसेच सर्व अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच राज्य मंडळाच्या शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होते. त्यामुळे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सध्या बंद आहेत.

आरटीईचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

एसएससी व एचएससी बोर्डाच्या शाळा बंद असल्या, तरी सीबीएसई व इतर बोर्डाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यापासूनच सुरू होते. त्यामुळे सध्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत ३० एप्रिलनंतर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सध्या ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे.