शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

राज्यातील ९८.३२ टक्के शाळांचा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST

पुणे : शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी प्रत्येक शाळेकडून प्रयत्न केले जातात. परंतु, यंदा विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन ...

पुणे : शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी प्रत्येक शाळेकडून प्रयत्न केले जातात. परंतु, यंदा विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल तयार करण्याची जबाबदारी शाळांकडेच होती. त्यामुळे काही अपवाद वगळता अनेक शाळांनी या संधीचा फायदा घेतला. परिणामी यावर्षी राज्यातील ९८.३२ टक्के शाळांचा शंभर टक्के, तर केवळ ९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या आकडेवाडीनुसार राज्यातील एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के तर, ३५२ शाळांचा निकाल ९० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहे. तर केवळ १४ शाळांचा निकाल ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान आहे. तसेच ८ शाळांचा निकाल ५० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

पुणे विभागातील २, नागपूर विभागातील ४, तर मुंबई विभागाचा निकाल २ आणि नाशिक विभागातील एका शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

--------------------------

शाळांकडून तयार करण्यात आलेला निकाल वस्तुस्थितीला धरूनच आहे. इयत्ता नववीचे गुण आणि दहावीचे अंतर्गत गुण या आधारावर निकाल प्रसिद्ध झाला. त्यामुळे आपोआपच शाळांचा निकाल वाढला आहे.

- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, पुणे