शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

कोरोनाचा धोका कमी झाल्यास निर्बंध हळूहळू कमी केले जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे मान्य आहे परंतु मध्यंतरी आपण निर्बंध कमी केले. त्यानंतर अचानक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. लोकांचा जीव वाचला पाहिजे. लोकांचा जीव वाचवण्याला आपलं पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे जसा धोका कमी होईल, तसे निर्बंध हळूहळू कमी केले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडद्यामागील कलाकारांना दिले.

संवाद पुणे आणि आनंदी वास्तू यांच्या वतीने पुण्यातील पडद्यामागील २०० कलाकार-तंत्रज्ञांचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघात विमा उतरविण्यात आला असून या विमा प्रमाणपत्रांचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण आज (दि. २ जुलै) उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर उपस्थित होते. दरम्यान, पडद्यामागील कलाकारांचा विमा उतरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाच लाख रुपये देण्याची घोषणाही पवार यांनी केली.

सुनील महाजन प्रास्ताविकात म्हणाले, ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह खुली करण्यास परवानगी मिळावी, महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये नाट्य परिषदांना जागा मिळावी, कलावंतांसाठी असलेल्या वृद्धाश्रमाचा प्रश्न मार्गी लागावा.

कलाकारांच्या वतीने मागण्यांचे निवेदन सुरेंद्र गोखले आणि अरुण पोमण यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिले. कलाकरांच्या वतीने गोखले यांनी समस्या मांडल्या. पवार यांचे स्वागत निकिता मोघे आणि आनंद पिंपळकर यांनी तर उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

----------------------------------

रंगभूमीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांची संपूर्ण माहिती नसल्यामुळे शासनातर्फे मदत देण्यात अडचणी येतात. कलाकारांची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. गरजू कलाकारांना शासनातर्फे मदत देण्यासाठी केवळ मुंबई-पुण्याचा विचार करून उपयोग नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत विखुरलेल्या कलाकारांचा एकत्रितपणे विचार करावा लागेल. कराच्या रूपातून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. गरजूंना मदत करण्यासाठी शासनाची कर्ज काढण्याचीही तयारी आहे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री