शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना लगाम

By admin | Updated: November 8, 2014 00:21 IST

जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी शासनाने पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक

पुणे : जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी शासनाने पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ७० अभियंत्यांची शुक्रवारी नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांना लगाम बसणार आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींकडे कोणत्याही स्वरूपाची यंत्रणा नाही. तसेच तांत्रिक मार्गदर्शक उपलब्ध नसल्याने बांधकामे अधिकृत आहेत की अनधिकृत हे देखील लक्षात येत नाही. सध्या जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. परंतु ही बांधकामे सुरु असताना ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही हरकत घेत नाही अथवा कारवाई करत नाही. अशा बांधकामे ग्रामपंचायतींकडे नोंदीसाठी आल्यानंतर सरदचे बांधकाम परवानगीनुसारच झाले आहे का, याची कुठलीही तपासणी होत नाही. तसेच परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करून सुपर बिल्टअप एरिया वाढविला जातो. या सर्व गोष्टींची तपासणी करण्यासाठी कोणतेही तांत्रिक मनुष्यबळ ग्रामपंचायतींकडे नाही. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत उदा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार मिळणार निधी, दलित वस्ती सुधारणा निधी, जमीन महसुलावर मिळणारा उपकर आणि मुद्रांक शुल्क आदी माध्यमातून ग्रामपंचायतींना दर वर्षी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होतो. या निधीमधून विविध विकासकामे करण्यासाठी आणि ती दर्जेदार होण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे असलेले मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे ग्रामपंचायतींना पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार व गुणात्मक कामे होण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. (प्रतिनिधी)