शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

अनधिकृत बांधकामांना लगाम

By admin | Updated: November 8, 2014 00:21 IST

जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी शासनाने पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक

पुणे : जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी शासनाने पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ७० अभियंत्यांची शुक्रवारी नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांना लगाम बसणार आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींकडे कोणत्याही स्वरूपाची यंत्रणा नाही. तसेच तांत्रिक मार्गदर्शक उपलब्ध नसल्याने बांधकामे अधिकृत आहेत की अनधिकृत हे देखील लक्षात येत नाही. सध्या जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. परंतु ही बांधकामे सुरु असताना ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही हरकत घेत नाही अथवा कारवाई करत नाही. अशा बांधकामे ग्रामपंचायतींकडे नोंदीसाठी आल्यानंतर सरदचे बांधकाम परवानगीनुसारच झाले आहे का, याची कुठलीही तपासणी होत नाही. तसेच परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करून सुपर बिल्टअप एरिया वाढविला जातो. या सर्व गोष्टींची तपासणी करण्यासाठी कोणतेही तांत्रिक मनुष्यबळ ग्रामपंचायतींकडे नाही. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत उदा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार मिळणार निधी, दलित वस्ती सुधारणा निधी, जमीन महसुलावर मिळणारा उपकर आणि मुद्रांक शुल्क आदी माध्यमातून ग्रामपंचायतींना दर वर्षी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होतो. या निधीमधून विविध विकासकामे करण्यासाठी आणि ती दर्जेदार होण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे असलेले मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे ग्रामपंचायतींना पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार व गुणात्मक कामे होण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. (प्रतिनिधी)