शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

विमानतळबाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम

By admin | Updated: May 3, 2017 01:52 IST

विमानतळामुळे या परिसरातील सात गावे बाधित होणार असून, साधारण हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. सरकारने

खळद : विमानतळामुळे या परिसरातील सात गावे बाधित होणार असून, साधारण हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. सरकारने काहीही पॅकेजेस जाहीर केले तरी बाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम राहणार असल्याचे विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी सांगितले .खानवडी येथे विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या विमानतळविरोधी संघर्ष समितीच्या वतीने ३० एप्रिल रोजी रात्री तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी झुरंगे बोलत होते. या वेळी पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अमोल कामठे, सुनंदा झेंडे, माजी सरपंच रामदास होले, बाबा पंडोल, लक्ष्मण गायकवाड, अमोल टिळेकर, चंद्रशेखर मेमाणे, काका सावंत, विलास झेंडे, रामचंद्र कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, नामदेव कुंभारकर, सतीश कुंभारकर आदी उपस्थित होते. या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांनी घरी गेल्यानंतर आपल्या घरातील लोकांचा विचार घ्यावा. ज्यांना जमीन शासनाला द्यायची आहे त्यांना आमचा विरोध नाही. शेतकऱ्यांनी आपला निर्णय आपण स्वत: गुरुवारी कुंभारवळण येथे होणाऱ्या बैठकीत जाहीर करावा, असे दत्ता झुरंगे यांनी सांगितले. पारगाव-माळशिरस पाणी योजना ऐन उन्हाळ्यात बंद आहे. यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही योजना चालू करण्यात लक्ष घातले तर लोकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पण तसे न होता विमानतळाच्या माध्यमातून मात्र लोकांवर गदा आणण्याचे काम केले जात आहे, असे पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते यांनी सांगितले. रमेश बोरावके, संतोष हगवणे, जी. टी. पवार, माजी सरपंच रामदास होले आदींनी आपले विचार व्यक्त केले.जितेंद्र मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव टिळेकर यांनी आभार मानले.