शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

विमानतळबाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम

By admin | Updated: May 3, 2017 01:52 IST

विमानतळामुळे या परिसरातील सात गावे बाधित होणार असून, साधारण हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. सरकारने

खळद : विमानतळामुळे या परिसरातील सात गावे बाधित होणार असून, साधारण हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. सरकारने काहीही पॅकेजेस जाहीर केले तरी बाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम राहणार असल्याचे विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी सांगितले .खानवडी येथे विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या विमानतळविरोधी संघर्ष समितीच्या वतीने ३० एप्रिल रोजी रात्री तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी झुरंगे बोलत होते. या वेळी पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अमोल कामठे, सुनंदा झेंडे, माजी सरपंच रामदास होले, बाबा पंडोल, लक्ष्मण गायकवाड, अमोल टिळेकर, चंद्रशेखर मेमाणे, काका सावंत, विलास झेंडे, रामचंद्र कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, नामदेव कुंभारकर, सतीश कुंभारकर आदी उपस्थित होते. या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांनी घरी गेल्यानंतर आपल्या घरातील लोकांचा विचार घ्यावा. ज्यांना जमीन शासनाला द्यायची आहे त्यांना आमचा विरोध नाही. शेतकऱ्यांनी आपला निर्णय आपण स्वत: गुरुवारी कुंभारवळण येथे होणाऱ्या बैठकीत जाहीर करावा, असे दत्ता झुरंगे यांनी सांगितले. पारगाव-माळशिरस पाणी योजना ऐन उन्हाळ्यात बंद आहे. यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही योजना चालू करण्यात लक्ष घातले तर लोकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पण तसे न होता विमानतळाच्या माध्यमातून मात्र लोकांवर गदा आणण्याचे काम केले जात आहे, असे पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते यांनी सांगितले. रमेश बोरावके, संतोष हगवणे, जी. टी. पवार, माजी सरपंच रामदास होले आदींनी आपले विचार व्यक्त केले.जितेंद्र मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव टिळेकर यांनी आभार मानले.