शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उद्या बरबाद होण्यापेक्षा आजच प्रतिकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या बदलाने बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे त्याला जोडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या बदलाने बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे त्याला जोडून असणारे शेतकरी, अडते, हमाल, समितीचे कर्मचारी अशा सर्वच घटकांचे अपरिमित नुकसान होणार आहे. उद्या बरबाद व्हायचे नसेल तर आजच या दुरूस्त्यांना रस्त्यावर येऊन विरोध करा,” असे आवाहन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले.

केंद्राच्या कायद्याच्या विरोधात भारत बंद नागरिक कृती समिती व अंगमेहनत कष्टकरी संघर्ष समिती यांच्या वतीने शुक्रवारी (दि. २७) राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, पथारी व्यावसायिक पंचायत, शेतकरी कामगार पक्ष, लोकायत व अन्य संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

शेतकऱ्यांचे प्रतिक म्हणून आंदोलनात खुरप्याची प्रतिकृती होती. पिकांना किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे, पिकांना हमी भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात येत होत्या. डॉ. आढाव यांच्यासह समितीचे निमंत्रक नितिन पवार, संतोष नांगरे, गोरख मेंगडे, सागर आल्हाट, हनुमंत बहिरट, राजेंद्र चोरगे, बाळासाहेब मोरे, कल्याणी दुर्गा रवींद्र यांचीही भाषणे झाली. पणन मंडळाचे व्यवस्थापक अनिल पवार यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.