शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

उद्या बरबाद होण्यापेक्षा आजच प्रतिकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या बदलाने बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे त्याला जोडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या बदलाने बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे त्याला जोडून असणारे शेतकरी, अडते, हमाल, समितीचे कर्मचारी अशा सर्वच घटकांचे अपरिमित नुकसान होणार आहे. उद्या बरबाद व्हायचे नसेल तर आजच या दुरूस्त्यांना रस्त्यावर येऊन विरोध करा,” असे आवाहन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले.

केंद्राच्या कायद्याच्या विरोधात भारत बंद नागरिक कृती समिती व अंगमेहनत कष्टकरी संघर्ष समिती यांच्या वतीने शुक्रवारी (दि. २७) राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, पथारी व्यावसायिक पंचायत, शेतकरी कामगार पक्ष, लोकायत व अन्य संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

शेतकऱ्यांचे प्रतिक म्हणून आंदोलनात खुरप्याची प्रतिकृती होती. पिकांना किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे, पिकांना हमी भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात येत होत्या. डॉ. आढाव यांच्यासह समितीचे निमंत्रक नितिन पवार, संतोष नांगरे, गोरख मेंगडे, सागर आल्हाट, हनुमंत बहिरट, राजेंद्र चोरगे, बाळासाहेब मोरे, कल्याणी दुर्गा रवींद्र यांचीही भाषणे झाली. पणन मंडळाचे व्यवस्थापक अनिल पवार यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.