शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

धरणग्रस्तांचे आंदोलन पुन्हा स्थगित

By admin | Updated: April 9, 2016 01:53 IST

विविध मागण्यांसाठी व धरणातून खाली सोडलेले पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी पुन्हा भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी धरणावर आलेल्या

भोर : विविध मागण्यांसाठी व धरणातून खाली सोडलेले पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी पुन्हा भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी धरणावर आलेल्या आंदोलकांना ११ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. कोणतेही ठोस आश्वासन न मिळताही दुसऱ्यांदा आंदोलन स्थगित करण्यात आले. पाडव्यामुळे आंदोलक कमी पोलीस अधिक अशी परिस्थिती होती.२५ मार्चला भाटघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी व धरणातून बेकायदेशीर पाणी खाली सोडल्याने सुमारे ४० गावांतील नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी आलेल्या धरणग्रस्तांना अटक करून सोडून देण्यात आले होते. पुन्हा त्याच मागण्यांसाठी आंदोलन करण्यासाठी भाटघर धरणग्रस्त आले होते. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आंदोलकांपेक्षा पोलीस बळच अधिक प्रमाणात होते. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांच्याशी चर्चा केली. ११ एप्रिलला जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेतले. या वेळी नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, शाखा अभियंता देवडे, पोलीस अधिकारी धरणग्रस्त समितीचे सरचिटणीस आनंदराव सणस, भगवान कंक, काळुराम मळेकर, पार्वती धुमाळ, बबन गोळे, माऊली दानवले, श्यामराव धुमाळ, रामचंद्र हिरगुडे, मारुती रहाटवडे, कृष्णा बोडके, शंकर मळेकर, अशोक दानवले व धरणग्रस्त उपस्थित होते.