शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अनधिकृत इमल्यामुळे रहिवासी चिंतेत

By admin | Updated: November 10, 2014 05:04 IST

नऱ्हे येथील अनधिकृत इमारत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे

जयवंत गंधाले, हडपसरनऱ्हे येथील अनधिकृत इमारत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्व भागातील कदम-वाकवस्ती, हांडेवाडी, मांजरी, शेवाळेवाडी, केशवनगर आदी उपनगरांलगतच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होण्याच्या चर्चेने सदनिकाधारक घाबरले आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् पोटात भीती असल्याने रहिवासी चिंतेत आहेत. मात्र, ग्रामपंचायती व जिल्हा प्रशासनाने हात वर केले आहेत.महापालिका हद्दीलगतच्या गावांतील अनधिकृत बांधकामांचे इमले काही एका दिवसात तयार झालेले नाहीत. ग्रामपंचायतीचा आशीर्वाद अन् जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळेच अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. नवीन बांधकामाच्या जुन्या नोंदी करण्यात ग्रामपंचायतीने हात धुऊन घेतले आहे. मात्र, सर्वसामान्य नोकरदार व मध्यमवर्गीय परवडणाऱ्या घराच्या आशेने अनधिकृत बांधकामाला बळी पडले आहेत. त्यासाठी बिल्डर जितक्या प्रमाणात जबाबदार आहेत, तितकेच प्रशासनही आहे. मात्र, एखादी इमारत कोसळल्यानंतर पुन्हा सामान्य नागरिकांच्या घरावरच प्रशासनाचा हातोडा पडतो, अशी व्यथा नागरिकांना लोकमतशी बोलताना मांडली. महापालिका हद्दीत नव्याने ४३ गावांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये पूर्व भागातील कदम-वाकवस्ती, हांडेवाडी, मांजरी, शेवाळेवाडी, केशवनगरचा समावेश आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी नव्याने गावांचा समावेश करण्याची अधिसूचना काढली. त्यानंतर हद्दीलगतच्या गावांतील अनधिकृत बांधकामाला वेग आला आहे. उपनगरालगतच्या प्रत्येक गावात बेकायदा बांधकामे बिनदिक्कत सुरू आहेत. दोन-तीन मजल्यांची परवानगी घ्यायची आणि पाच-सात मजल्यांपर्यंत बांधकामे केली आहेत. ग्राहकांना सदनिकेची विक्री करताना नियोजन विभागाने बांधकाम सुरू करताना दिलेला परवाना दाखविला जातो. ग्राहकांची दिशाभूल करण्यात व्यावसायिक तरबेज आहेत. इमारती बांधताना कोणतेही नियम पाळलेले नसतात, त्यामुळे एखादी दुर्घटना घडली, तर तातडीची सेवा देता येणेही अवघड होऊन बसत आहे.