शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

वडारवाडीतील रहिवासी पुनर्वसन प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST

पुणे : वडारवाडीतील प्लॉट नंबर ३३४ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडला आहे. प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारे लेखी स्वरूपात माहिती ...

पुणे : वडारवाडीतील प्लॉट नंबर ३३४ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडला आहे. प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारे लेखी स्वरूपात माहिती न दिल्याने लाभार्थी संभ्रमात आहेत, तर प्रकल्पाबाबत काही स्थानिक लोक विनाकारण आडकाठी आणत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात १८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे निर्देश असताना चार वर्षांहून अधिक काळ लोटला तरी कॉलम उभारण्याच्या पुढे काम सरकले नाही. या सर्व गोष्टींकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

वडारवाडी येथे झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासन यांनी २०१७ साली जागा ताब्यात घेऊन बांधकामास सुरुवात केली. कॉलम उभारणीनंतर येथील काम पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे तब्बल १२६ कुटुंबांचे हाल होत आहेत. मूळ जागा मालकांना येथे घर मिळणार आहे. सध्या ते परिसरातच भाड्याने खोली घेऊन राहतात. त्यासाठी विकसकातर्फे या १२६ कुटुंबांना दरमहा ३ हजार रुपये भाड्यापोटी मिळतात. मात्र ते अपुरे आहे. कारण परिसरात ६ ते ८ हजार रुपयांपर्यंत भाडे असल्याने आर्थिकदृष्ट्या ते परवडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकतर घरभाडे वाढवून मिळावे किंवा प्रकल्प लवकर पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.

-------------------

विकसकाने माझ्या पालकांचे घरभाडे दोन वर्षांपासून थकवले आहे. याबाबतीत प्राधिकरणामध्ये तक्रार केली. मात्र अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्रकल्पाला परवानगी देऊन मोठी चूक केलीय का, असे वाटायला लागले आहे.

- रवी कांबळे, प्रकल्प लाभार्थी

---

विकसक वेगवेगळी कारणे सांगून आमची दिशाभूल करत आहे, असे आम्हाला वाटू लागले आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे.

- अजहर शेख, प्रकल्प लाभार्थी

---

आम्हास विकासकाकडून जे घरभाडे तीन वर्षांपासून मिळते ते पुरेसे नाही. आम्हाला बाहेर दरमहा सहा ते आठ हजार रुपये भाडे भरावे लागते. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत घरभाडे वाढवून मिळावे.

- आकाश मयूर, प्रकल्प लाभार्थी

-----

प्रत्येक कुटुंबाला आम्ही दरमहा तीन हजार रुपये भाड्यापोटी देत आहोत. एक झाड आणि महापालिकेचे स्वच्छतागृह काढण्यासाठी स्थानिक लोकांनी विरोध केल्याने यात वर्षभराचा कालावधी गेला. त्यानंतर कोरोना संकटामुळे काम सध्या थांबले आहे.

- नीलेश खेडेकर, प्रकल्प विकसक, बांधकाम व्यावसायिक

----

राज्य शासनाच्या नवीन नियमावलीमुळे या प्रकल्पासाठी नव्याने काही परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यातच कोरोना संकटामुळे कामगार गावी गेल्याने दीड वर्षापासून प्रकल्प थांबला आहे. लॉकडाऊन उठल्यावर विकासकाला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देणार आहे.

- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प

---

फोटो ओळ : वडारवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाचे उभारलेले कॉलम.