शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वडारवाडीतील रहिवासी पुनर्वसन प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST

पुणे : वडारवाडीतील प्लॉट नंबर ३३४ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडला आहे. प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारे लेखी स्वरूपात माहिती ...

पुणे : वडारवाडीतील प्लॉट नंबर ३३४ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडला आहे. प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारे लेखी स्वरूपात माहिती न दिल्याने लाभार्थी संभ्रमात आहेत, तर प्रकल्पाबाबत काही स्थानिक लोक विनाकारण आडकाठी आणत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात १८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे निर्देश असताना चार वर्षांहून अधिक काळ लोटला तरी कॉलम उभारण्याच्या पुढे काम सरकले नाही. या सर्व गोष्टींकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

वडारवाडी येथे झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासन यांनी २०१७ साली जागा ताब्यात घेऊन बांधकामास सुरुवात केली. कॉलम उभारणीनंतर येथील काम पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे तब्बल १२६ कुटुंबांचे हाल होत आहेत. मूळ जागा मालकांना येथे घर मिळणार आहे. सध्या ते परिसरातच भाड्याने खोली घेऊन राहतात. त्यासाठी विकसकातर्फे या १२६ कुटुंबांना दरमहा ३ हजार रुपये भाड्यापोटी मिळतात. मात्र ते अपुरे आहे. कारण परिसरात ६ ते ८ हजार रुपयांपर्यंत भाडे असल्याने आर्थिकदृष्ट्या ते परवडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकतर घरभाडे वाढवून मिळावे किंवा प्रकल्प लवकर पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.

-------------------

विकसकाने माझ्या पालकांचे घरभाडे दोन वर्षांपासून थकवले आहे. याबाबतीत प्राधिकरणामध्ये तक्रार केली. मात्र अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्रकल्पाला परवानगी देऊन मोठी चूक केलीय का, असे वाटायला लागले आहे.

- रवी कांबळे, प्रकल्प लाभार्थी

---

विकसक वेगवेगळी कारणे सांगून आमची दिशाभूल करत आहे, असे आम्हाला वाटू लागले आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे.

- अजहर शेख, प्रकल्प लाभार्थी

---

आम्हास विकासकाकडून जे घरभाडे तीन वर्षांपासून मिळते ते पुरेसे नाही. आम्हाला बाहेर दरमहा सहा ते आठ हजार रुपये भाडे भरावे लागते. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत घरभाडे वाढवून मिळावे.

- आकाश मयूर, प्रकल्प लाभार्थी

-----

प्रत्येक कुटुंबाला आम्ही दरमहा तीन हजार रुपये भाड्यापोटी देत आहोत. एक झाड आणि महापालिकेचे स्वच्छतागृह काढण्यासाठी स्थानिक लोकांनी विरोध केल्याने यात वर्षभराचा कालावधी गेला. त्यानंतर कोरोना संकटामुळे काम सध्या थांबले आहे.

- नीलेश खेडेकर, प्रकल्प विकसक, बांधकाम व्यावसायिक

----

राज्य शासनाच्या नवीन नियमावलीमुळे या प्रकल्पासाठी नव्याने काही परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यातच कोरोना संकटामुळे कामगार गावी गेल्याने दीड वर्षापासून प्रकल्प थांबला आहे. लॉकडाऊन उठल्यावर विकासकाला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देणार आहे.

- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प

---

फोटो ओळ : वडारवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाचे उभारलेले कॉलम.