शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नगर रस्ता बीआरटीला प्रजासत्ताकदिनी मुहूर्त

By admin | Updated: December 20, 2015 02:24 IST

महापालिकेकडून बांधून तयार असलेल्या ‘संगमवाडी ते नगर रस्ता बीआरटी’साठी २६ जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे; मात्र हा मार्ग सुरू करण्यासाठी पीएमपी

पुणे : महापालिकेकडून बांधून तयार असलेल्या ‘संगमवाडी ते नगर रस्ता बीआरटी’साठी २६ जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे; मात्र हा मार्ग सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून टर्मिनलची अट घातली असतानाही ही टर्मिनलची जागा मिळण्याआधीच महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हा मार्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, टर्मिनलसाठी केसनंद फाटा येथील ९ एकर जागेबाबत महापालिकेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, त्या ठिकाणची अडीच एकर जागा जिल्हा प्रशासनाकडून देण्याची तयारी दर्शविली आहे. ही जागा मिळण्यास उशीर होणार असल्याने, ती मिळेपर्यंत काही महिने ही जागा भाडेकराराने घेण्यात येणार आहे. महापालिकेकडून ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ आणि ‘संगमवाडी ते खराडी’ या मार्गावर बीआरटी मार्ग उभारलेला आहे. त्यातील पहिला मार्ग तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेला आहे, तर नगर रस्त्याचा मार्ग ९० टक्के पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरही बीआरटी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे; मात्र हा मार्ग सुरू करण्यासाठी बस टर्मिनल आवश्यक असून तो नसल्यास, हा मार्ग सुरू करणार नसल्याची भूमिका पीएमपीकडून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे बांधून तयार असलेला हा मार्ग गेल्या वर्षभरापासून पडून आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडून टर्मिनलसाठी जागा शोधण्यात येत होती. सुरुवातील वाघोली जकातनाक्या जवळील जागा पाहण्यात आली होती; मात्र ही जागा मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर आत असल्याने, तिचा फायदा नव्हता. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून दुसऱ्या जागेची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासना कडून केसनंद फाटा येथील ९ एकर जागा पाहण्यात आली होती. या जागेबाबत आज झालेल्या बैठकीत या जागेतील ४ एकर जागेचे वाटप झालेले असून, उर्वरित पाच एकर जागेतील अडीच एकर बस टर्मिनलसाठी जागा देण्याबाबत मान्यता आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही जागा मिळण्यास उशीर लागणार असल्याने काही महिने ही जागा भाडेकराराने देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.(प्रतिनिधी)एका महिन्याचा कालबद्ध कार्यक्रम ही जागा निश्चित झाल्याने हा मार्ग सुरू करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार, प्रत्येक विभागास काम पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर, ‘पर्णकुटी ते येरवडा’ आणि ‘येरवडा ते खराडी जकात नाक्या’पर्यंत ही बीआरटी धावणार आहे. त्यानंतर टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यावर, ती वाघोलीपर्यंत धावणार आहे. त्यानुसार, या मार्गाचे उद्घाटन प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी करण्यात येणार आहे.