शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:04 IST

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात.

पुणे/पिंपरी : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात. मात्र, या परीक्षेत गुण कमी पडले म्हणजे सर्वकाही संपलं असं नाही, वर्ष वाया न जाऊ देता हे गुण सुधारण्याची एक चांगली संधी बोर्डाकडून उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो या परीक्षांचे दडपण झुगारून त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा, असे आवाहन शिक्षकांकडून करण्यात आले आहे. पिंपरीमध्ये बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा कठीण गेली म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. बोर्डाच्या परीक्षेतील यश म्हणजेच सर्वकाही मानून विद्यार्थी हे टोकाचे मार्ग अवलंबतात. मात्र, त्यांच्या या कृत्याचा पालकांना, कुटुंबीयांना आयुष्यभराचा धक्का सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ताणतणावांचा हसत-खेळत मुकाबला करायला शिकले पाहिजे.नववी परीक्षा संपते नाही तोपर्यंत दहावीचे भूत मानगुटीवर बसलेलेच असते. कठोर शिस्तीमधील दहावीचे वर्ष पार पडल्यानंतर अकरावीची छोटीशी विश्रांती मिळते. त्यानंतर पुन्हा बारावी, नीट, सीईटी, जेईई, जेईई अ‍ॅडव्हान्स आदी परीक्षांच्या आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण कालखंड असतो. आपली तयारी चांगली झाली आहे, तसंच सर्वच विषय आपल्याला झेपणारे आहेत, असा आपला विश्वास द्विगुणित होतो.काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाहीदहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणाºयांची टक्केवारीखूपच कमी झाली आहे. आपण दहावीच्या परीक्षेमध्ये नापासहोऊ, याची एक अनामिक भीती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनावाटत असते. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून जिल्हानिहाय समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.परीक्षेच्या बदलेल्या स्वरूपामुळे नापास होणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झाली आहे, त्यामुळे तुम्ही नापास होऊच शकत नाही, असा विद्यार्थ्यांना धीर देण्याचे काम समुपदेशकांकडून केले जाते.पुणे विभागीय मंडळाकडून रमेश पाटील (पुणे) - ९८२२३३४१०१, एस. एल. कानडे (नगर) -९०२८०२७३५३, पी. एस. तोरणे(सोलापूर) - ९९६०००२९५७ या समुपदेशकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेबाबतच्या कुठल्याही समस्येबाबत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थी त्यांना फोन करू शकतील असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य मंडळाकडून समुपदेशक म्हणून आमचे मोबाइल क्रमांक जाहीर केल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे फोन कॉल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातले काही फोन वेगवेगळया विषयांमधील अडचणींबाबत होते. काही विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना नेमके कशाचे दडपण येत आहे, याचा खोलात जाऊन शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या त्या कारणांनुसार त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. दडपण दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. - पी. एस. तोरणे, समुपदेशकविद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला सारून मानसिक ताण न घेता धैर्याने परीक्षेला सामोरे जाणे आवश्यक आहे. दहावी व बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन करून अभ्यास करावा व मुद्देसूद प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करावा. सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी सकारात्मक दृष्टीने विचार करून परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे.- एकनाथ उगले, पालक, निगडीपरीक्षेच्या काळातही काळजी घ्यापुरेशी झोप घ्या. कमीत कमी७ ते ८ तास झोप घ्या.अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. जेवण, झोप व अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या.लिहिणे आणि बसणे याचा सराव या काळात ठेवायलाच हवा.परीक्षेच्या काळात शक्यतो मोबाइल फोन बंद ठेवणेच जास्त चांगले.परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात वर्षभरात काढलेल्या नोट्सच्या अभ्यासवर भर द्यावा.संपूर्ण दिवस अखंड अभ्यास करण्यापेक्षा, मधे मधे छोटेब्रेक, विश्रांती घ्यावी.आवडीच्या विषयानेअभ्यासाची सुरुवात करावी.परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात मॉडेल टेस्ट पेपर तीन तासांचीवेळ लावून सोडवण्याचा सराव करायला हवा.गरज वाटत असल्यास,मोठ्यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.प्रत्येक दिवशी स्वत:च्या सोयीनुसार व आवडीनुसारसर्वच विषयांना थोडा-थोडावेळ द्यावा.

टॅग्स :examपरीक्षा