शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:04 IST

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात.

पुणे/पिंपरी : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात. मात्र, या परीक्षेत गुण कमी पडले म्हणजे सर्वकाही संपलं असं नाही, वर्ष वाया न जाऊ देता हे गुण सुधारण्याची एक चांगली संधी बोर्डाकडून उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो या परीक्षांचे दडपण झुगारून त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा, असे आवाहन शिक्षकांकडून करण्यात आले आहे. पिंपरीमध्ये बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा कठीण गेली म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. बोर्डाच्या परीक्षेतील यश म्हणजेच सर्वकाही मानून विद्यार्थी हे टोकाचे मार्ग अवलंबतात. मात्र, त्यांच्या या कृत्याचा पालकांना, कुटुंबीयांना आयुष्यभराचा धक्का सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ताणतणावांचा हसत-खेळत मुकाबला करायला शिकले पाहिजे.नववी परीक्षा संपते नाही तोपर्यंत दहावीचे भूत मानगुटीवर बसलेलेच असते. कठोर शिस्तीमधील दहावीचे वर्ष पार पडल्यानंतर अकरावीची छोटीशी विश्रांती मिळते. त्यानंतर पुन्हा बारावी, नीट, सीईटी, जेईई, जेईई अ‍ॅडव्हान्स आदी परीक्षांच्या आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण कालखंड असतो. आपली तयारी चांगली झाली आहे, तसंच सर्वच विषय आपल्याला झेपणारे आहेत, असा आपला विश्वास द्विगुणित होतो.काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाहीदहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणाºयांची टक्केवारीखूपच कमी झाली आहे. आपण दहावीच्या परीक्षेमध्ये नापासहोऊ, याची एक अनामिक भीती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनावाटत असते. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून जिल्हानिहाय समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.परीक्षेच्या बदलेल्या स्वरूपामुळे नापास होणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झाली आहे, त्यामुळे तुम्ही नापास होऊच शकत नाही, असा विद्यार्थ्यांना धीर देण्याचे काम समुपदेशकांकडून केले जाते.पुणे विभागीय मंडळाकडून रमेश पाटील (पुणे) - ९८२२३३४१०१, एस. एल. कानडे (नगर) -९०२८०२७३५३, पी. एस. तोरणे(सोलापूर) - ९९६०००२९५७ या समुपदेशकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेबाबतच्या कुठल्याही समस्येबाबत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थी त्यांना फोन करू शकतील असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य मंडळाकडून समुपदेशक म्हणून आमचे मोबाइल क्रमांक जाहीर केल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे फोन कॉल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातले काही फोन वेगवेगळया विषयांमधील अडचणींबाबत होते. काही विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना नेमके कशाचे दडपण येत आहे, याचा खोलात जाऊन शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या त्या कारणांनुसार त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. दडपण दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. - पी. एस. तोरणे, समुपदेशकविद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला सारून मानसिक ताण न घेता धैर्याने परीक्षेला सामोरे जाणे आवश्यक आहे. दहावी व बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन करून अभ्यास करावा व मुद्देसूद प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करावा. सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी सकारात्मक दृष्टीने विचार करून परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे.- एकनाथ उगले, पालक, निगडीपरीक्षेच्या काळातही काळजी घ्यापुरेशी झोप घ्या. कमीत कमी७ ते ८ तास झोप घ्या.अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. जेवण, झोप व अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या.लिहिणे आणि बसणे याचा सराव या काळात ठेवायलाच हवा.परीक्षेच्या काळात शक्यतो मोबाइल फोन बंद ठेवणेच जास्त चांगले.परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात वर्षभरात काढलेल्या नोट्सच्या अभ्यासवर भर द्यावा.संपूर्ण दिवस अखंड अभ्यास करण्यापेक्षा, मधे मधे छोटेब्रेक, विश्रांती घ्यावी.आवडीच्या विषयानेअभ्यासाची सुरुवात करावी.परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात मॉडेल टेस्ट पेपर तीन तासांचीवेळ लावून सोडवण्याचा सराव करायला हवा.गरज वाटत असल्यास,मोठ्यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.प्रत्येक दिवशी स्वत:च्या सोयीनुसार व आवडीनुसारसर्वच विषयांना थोडा-थोडावेळ द्यावा.

टॅग्स :examपरीक्षा