शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:04 IST

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात.

पुणे/पिंपरी : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात. मात्र, या परीक्षेत गुण कमी पडले म्हणजे सर्वकाही संपलं असं नाही, वर्ष वाया न जाऊ देता हे गुण सुधारण्याची एक चांगली संधी बोर्डाकडून उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो या परीक्षांचे दडपण झुगारून त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा, असे आवाहन शिक्षकांकडून करण्यात आले आहे. पिंपरीमध्ये बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा कठीण गेली म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. बोर्डाच्या परीक्षेतील यश म्हणजेच सर्वकाही मानून विद्यार्थी हे टोकाचे मार्ग अवलंबतात. मात्र, त्यांच्या या कृत्याचा पालकांना, कुटुंबीयांना आयुष्यभराचा धक्का सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ताणतणावांचा हसत-खेळत मुकाबला करायला शिकले पाहिजे.नववी परीक्षा संपते नाही तोपर्यंत दहावीचे भूत मानगुटीवर बसलेलेच असते. कठोर शिस्तीमधील दहावीचे वर्ष पार पडल्यानंतर अकरावीची छोटीशी विश्रांती मिळते. त्यानंतर पुन्हा बारावी, नीट, सीईटी, जेईई, जेईई अ‍ॅडव्हान्स आदी परीक्षांच्या आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण कालखंड असतो. आपली तयारी चांगली झाली आहे, तसंच सर्वच विषय आपल्याला झेपणारे आहेत, असा आपला विश्वास द्विगुणित होतो.काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाहीदहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणाºयांची टक्केवारीखूपच कमी झाली आहे. आपण दहावीच्या परीक्षेमध्ये नापासहोऊ, याची एक अनामिक भीती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनावाटत असते. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून जिल्हानिहाय समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.परीक्षेच्या बदलेल्या स्वरूपामुळे नापास होणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झाली आहे, त्यामुळे तुम्ही नापास होऊच शकत नाही, असा विद्यार्थ्यांना धीर देण्याचे काम समुपदेशकांकडून केले जाते.पुणे विभागीय मंडळाकडून रमेश पाटील (पुणे) - ९८२२३३४१०१, एस. एल. कानडे (नगर) -९०२८०२७३५३, पी. एस. तोरणे(सोलापूर) - ९९६०००२९५७ या समुपदेशकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेबाबतच्या कुठल्याही समस्येबाबत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थी त्यांना फोन करू शकतील असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य मंडळाकडून समुपदेशक म्हणून आमचे मोबाइल क्रमांक जाहीर केल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे फोन कॉल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातले काही फोन वेगवेगळया विषयांमधील अडचणींबाबत होते. काही विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना नेमके कशाचे दडपण येत आहे, याचा खोलात जाऊन शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या त्या कारणांनुसार त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. दडपण दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. - पी. एस. तोरणे, समुपदेशकविद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला सारून मानसिक ताण न घेता धैर्याने परीक्षेला सामोरे जाणे आवश्यक आहे. दहावी व बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन करून अभ्यास करावा व मुद्देसूद प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करावा. सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी सकारात्मक दृष्टीने विचार करून परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे.- एकनाथ उगले, पालक, निगडीपरीक्षेच्या काळातही काळजी घ्यापुरेशी झोप घ्या. कमीत कमी७ ते ८ तास झोप घ्या.अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. जेवण, झोप व अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या.लिहिणे आणि बसणे याचा सराव या काळात ठेवायलाच हवा.परीक्षेच्या काळात शक्यतो मोबाइल फोन बंद ठेवणेच जास्त चांगले.परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात वर्षभरात काढलेल्या नोट्सच्या अभ्यासवर भर द्यावा.संपूर्ण दिवस अखंड अभ्यास करण्यापेक्षा, मधे मधे छोटेब्रेक, विश्रांती घ्यावी.आवडीच्या विषयानेअभ्यासाची सुरुवात करावी.परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात मॉडेल टेस्ट पेपर तीन तासांचीवेळ लावून सोडवण्याचा सराव करायला हवा.गरज वाटत असल्यास,मोठ्यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.प्रत्येक दिवशी स्वत:च्या सोयीनुसार व आवडीनुसारसर्वच विषयांना थोडा-थोडावेळ द्यावा.

टॅग्स :examपरीक्षा