शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

ऊसतोडणी कामगारांचा अहवाल वर्षानुवर्षे प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्यात संख्येने ५ लाख असलेल्या ऊसतोडणी कामगारांमध्ये सामाजिक, शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात यासाठी सरकार गेली अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: राज्यात संख्येने ५ लाख असलेल्या ऊसतोडणी कामगारांमध्ये सामाजिक, शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात यासाठी सरकार गेली अनेक वर्षे समित्या नियुक्त करते, मात्र या समित्यांचे अहवाल बासनात गुंडाळून ठेवले जात आहेत. या अहवालातील शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी ऊसतोडणी कामगारांनी राज्य सरकाकडे केली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची समिती सरकारने सन २०१९ मध्ये नियुक्त केली होती. ऊसतोडणी महिला कामगारांचे गर्भाशय काढण्यापासून ते त्यांना कोणत्याही आजारात कसल्याही सुविधा मिळत नसल्याचे या समितीने उजेडात आणले. त्याआधी दादासाहेब रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली (सन १९८६) समितीने ऊसतोडणी कामगारांसाठी कायदा करावा, त्यांच्यासाठी महामंडळ स्थापन करावे अशा शिफारसी केल्या होत्या.

राज्यात ऊसतोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्य ऊसतोडणी वाहतूक कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे, डॉ. संजय तांदळे, जीवन राठोड आदींनी या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. या शिफारशींची अंमलबजावणी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यात देण्यात आला आहे.