शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

बार्टीच्या फेलोशिपसाठी लागू केलेली अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:11 IST

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने अनुसूचित जातीतील (एससी) विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) ...

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने अनुसूचित जातीतील (एससी) विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) दिली जाते. यासाठी जानेवारी २०२१ मध्ये बार्टीने जाहिरात प्रसिद्ध करून सन २०१९ साठी १०६ जागांसाठी अर्ज मागविले आहेत. मात्र, राष्ट्रीय मानांकन प्राप्त पहिल्या शंभर संस्थांमधील उमेदवारांनाच या जागांचा लाभ घेता येईल, अशी अट बार्टीने लागू केल्याने या विरोधात विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अशी जाचक अट रद्द करण्याची मागणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजना २०१३ पासून सुरू केली आहे. मागील दोन वर्षांत या फेलोशिपची जाहिरात आली नाही. या योजनेची मागील सात वर्षांतील एकूण लाभार्थी संख्या केवळ १०५ आहे. २०२१ मध्ये दिलेल्या जाहिरातीत केवळ १ जागेची वाढ केली आहे. फेलोशिप देऊन विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

बार्टीच्या मूळ उद्देशाला हरताळ न फासता जाचक अटी काढून टाकून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळेल अशा सर्वसमावेशक या योजना राबविण्याची गरज आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर तो अर्जदार राष्ट्रीय मानांकित शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असावा ही जाचक अट का टाकली? राज्यात केवळ १२ महाविद्यालयांचा अशा मानांकित संस्थांमध्ये समावेश आहे. यात एकही पशुवैद्यक व कृषी विद्यापीठ नाही? या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार? याचा खुलासा करण्याची मागणी स्टुडंट्स हेल्पिंग हॅन्डचे कुलदीप आंबेकर यांनी केली आहे

चौकट

सात वर्षांत केवळ एकाच जागेत वाढ

सारथीने मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमीलेयर उमेदवारांसाठी अधिछात्रवृत्तीसाठी पहिल्याच वर्षी ५०० विद्यार्थ्यांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी कोणतीही अट टाकलेली नाही. यावर बार्टीने दिलेल्या अधिछात्रवृत्तीसाठी अट लागू करून गेल्या सात वर्षांत केवळ एकाच जागेत वाढ करून १०६ विद्यार्थ्यांना मंजुरी दिली आहे. कोणाच्या सांगण्यावरून ही अट घातली आहे. राजकीय हस्तक्षेप होत आहे का.? याची चौकशीची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.