शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST

पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा. या मागणीसाठी देशव्यापी शेतकरी आंदोलन गेले ६० दिवस चालू ...

पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा. या मागणीसाठी देशव्यापी शेतकरी आंदोलन गेले ६० दिवस चालू आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करत आहेत. यात आजवर १५२ आंदोलक शहीद झाले आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कामगार-सामाजिक संघटना, राजकीय पक्ष विविध प्रकारची आंदोलने करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची संघर्ष कहाणी या तरुणांनी सांगितली.

खाजगीकरण टाळा शेतकरी वाचवाचे फलक, संघटनेचे झेंडे, अनेक ठिकाणी लंगर, आंदोलनात पाण्याचा मारा-बॅरिगेट्स-पोलीस यांना सामोरे जाणे अशा गोष्टी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात पाहायला मिळाल्या, असे अनुभव शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या पुण्यातील तरुण शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकायतच्या वतीने शेतकरी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी तरुणांचे अनुभव कथन याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

दिल्लीतील सिंघू, टिकरी व गाझी सीमेवर सुरू असणाऱ्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी पुण्यातील २६ तरुण गेले होते. त्यामध्ये नोकरदार, इंजिनिअर, शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांचा समावेश होता.

विमल कुंडलिक म्हणाले, शेतकरी आंदोलनात शेतकरी महिलाही सहभागी झाल्या आहेत. शेकडो किलोमीटरवरून येऊन त्या बॉर्डरवर बसल्या आहेत. त्यांच्या घरी नवरा शेती सांभाळत आहे. या महिला मुलींना घेऊन सहभागी झाल्या आहेत. पंजाबमधील जे शेतकरी आंदोलनात आले आहेत. त्यांच्या महिला गावाकडे आत्मविश्वासाने काम करत आहेत.

---

दिल्लीत सर्व सुखसोयी उपलब्ध करून आंदोलन चालू ठेवले आहे. शेतकरी संघटनांकडून झेंडे, कॉर्पोरेट भागाओ किसान बचाओ असे मजकूर लिहिलेले फलक, शेतकऱ्यांकडे दिसून आले. शेतकरी एकमेकांना सहकार्य करून शांततेत आंदोलन करत आहेत. कार्टून्स, डिझाइन, च्या माध्यमातून अनेक अडचणींना तोंड देत शेतकरी विजयी झाला, असे दाखवण्यात आले आहे.

- गीतांजली प्रकाश, सहभागी आंदोलक

---

आंदोलनात येथील गुरुद्वाराकडून लंगर चालू केले आहे. शेतकऱ्यांबरोबर अनेक गरजू नागरिकही त्याचा लाभ घेत आहेत. एक महिन्याच्या आंदोलनात गरीब आणि कष्टकरी लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटला आहे. यावरून शेतकरी अन्नदाता असल्याचा संदेश समाजात पोहोचत आहे. शेतकरी आंदोलनात येणाऱ्या सरकारी अडथळ्यांनाही सामोरे जात आहे. तरुण पिढीसोबत ज्येष्ठही यामध्ये सहभागी झाले आहेत.

- कल्याणी दुर्गा रवींद्र, सहभागी आंदोलक