शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST

पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा. या मागणीसाठी देशव्यापी शेतकरी आंदोलन गेले ६० दिवस चालू ...

पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा. या मागणीसाठी देशव्यापी शेतकरी आंदोलन गेले ६० दिवस चालू आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करत आहेत. यात आजवर १५२ आंदोलक शहीद झाले आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कामगार-सामाजिक संघटना, राजकीय पक्ष विविध प्रकारची आंदोलने करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची संघर्ष कहाणी या तरुणांनी सांगितली.

खाजगीकरण टाळा शेतकरी वाचवाचे फलक, संघटनेचे झेंडे, अनेक ठिकाणी लंगर, आंदोलनात पाण्याचा मारा-बॅरिगेट्स-पोलीस यांना सामोरे जाणे अशा गोष्टी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात पाहायला मिळाल्या, असे अनुभव शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या पुण्यातील तरुण शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकायतच्या वतीने शेतकरी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी तरुणांचे अनुभव कथन याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

दिल्लीतील सिंघू, टिकरी व गाझी सीमेवर सुरू असणाऱ्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी पुण्यातील २६ तरुण गेले होते. त्यामध्ये नोकरदार, इंजिनिअर, शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांचा समावेश होता.

विमल कुंडलिक म्हणाले, शेतकरी आंदोलनात शेतकरी महिलाही सहभागी झाल्या आहेत. शेकडो किलोमीटरवरून येऊन त्या बॉर्डरवर बसल्या आहेत. त्यांच्या घरी नवरा शेती सांभाळत आहे. या महिला मुलींना घेऊन सहभागी झाल्या आहेत. पंजाबमधील जे शेतकरी आंदोलनात आले आहेत. त्यांच्या महिला गावाकडे आत्मविश्वासाने काम करत आहेत.

---

दिल्लीत सर्व सुखसोयी उपलब्ध करून आंदोलन चालू ठेवले आहे. शेतकरी संघटनांकडून झेंडे, कॉर्पोरेट भागाओ किसान बचाओ असे मजकूर लिहिलेले फलक, शेतकऱ्यांकडे दिसून आले. शेतकरी एकमेकांना सहकार्य करून शांततेत आंदोलन करत आहेत. कार्टून्स, डिझाइन, च्या माध्यमातून अनेक अडचणींना तोंड देत शेतकरी विजयी झाला, असे दाखवण्यात आले आहे.

- गीतांजली प्रकाश, सहभागी आंदोलक

---

आंदोलनात येथील गुरुद्वाराकडून लंगर चालू केले आहे. शेतकऱ्यांबरोबर अनेक गरजू नागरिकही त्याचा लाभ घेत आहेत. एक महिन्याच्या आंदोलनात गरीब आणि कष्टकरी लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटला आहे. यावरून शेतकरी अन्नदाता असल्याचा संदेश समाजात पोहोचत आहे. शेतकरी आंदोलनात येणाऱ्या सरकारी अडथळ्यांनाही सामोरे जात आहे. तरुण पिढीसोबत ज्येष्ठही यामध्ये सहभागी झाले आहेत.

- कल्याणी दुर्गा रवींद्र, सहभागी आंदोलक