शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
4
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
5
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
6
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
7
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
8
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
9
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
10
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
11
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
12
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
13
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
14
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
15
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
16
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
17
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
18
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
19
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
20
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST

पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा. या मागणीसाठी देशव्यापी शेतकरी आंदोलन गेले ६० दिवस चालू ...

पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा. या मागणीसाठी देशव्यापी शेतकरी आंदोलन गेले ६० दिवस चालू आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करत आहेत. यात आजवर १५२ आंदोलक शहीद झाले आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कामगार-सामाजिक संघटना, राजकीय पक्ष विविध प्रकारची आंदोलने करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची संघर्ष कहाणी या तरुणांनी सांगितली.

खाजगीकरण टाळा शेतकरी वाचवाचे फलक, संघटनेचे झेंडे, अनेक ठिकाणी लंगर, आंदोलनात पाण्याचा मारा-बॅरिगेट्स-पोलीस यांना सामोरे जाणे अशा गोष्टी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात पाहायला मिळाल्या, असे अनुभव शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या पुण्यातील तरुण शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकायतच्या वतीने शेतकरी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी तरुणांचे अनुभव कथन याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

दिल्लीतील सिंघू, टिकरी व गाझी सीमेवर सुरू असणाऱ्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी पुण्यातील २६ तरुण गेले होते. त्यामध्ये नोकरदार, इंजिनिअर, शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांचा समावेश होता.

विमल कुंडलिक म्हणाले, शेतकरी आंदोलनात शेतकरी महिलाही सहभागी झाल्या आहेत. शेकडो किलोमीटरवरून येऊन त्या बॉर्डरवर बसल्या आहेत. त्यांच्या घरी नवरा शेती सांभाळत आहे. या महिला मुलींना घेऊन सहभागी झाल्या आहेत. पंजाबमधील जे शेतकरी आंदोलनात आले आहेत. त्यांच्या महिला गावाकडे आत्मविश्वासाने काम करत आहेत.

---

दिल्लीत सर्व सुखसोयी उपलब्ध करून आंदोलन चालू ठेवले आहे. शेतकरी संघटनांकडून झेंडे, कॉर्पोरेट भागाओ किसान बचाओ असे मजकूर लिहिलेले फलक, शेतकऱ्यांकडे दिसून आले. शेतकरी एकमेकांना सहकार्य करून शांततेत आंदोलन करत आहेत. कार्टून्स, डिझाइन, च्या माध्यमातून अनेक अडचणींना तोंड देत शेतकरी विजयी झाला, असे दाखवण्यात आले आहे.

- गीतांजली प्रकाश, सहभागी आंदोलक

---

आंदोलनात येथील गुरुद्वाराकडून लंगर चालू केले आहे. शेतकऱ्यांबरोबर अनेक गरजू नागरिकही त्याचा लाभ घेत आहेत. एक महिन्याच्या आंदोलनात गरीब आणि कष्टकरी लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटला आहे. यावरून शेतकरी अन्नदाता असल्याचा संदेश समाजात पोहोचत आहे. शेतकरी आंदोलनात येणाऱ्या सरकारी अडथळ्यांनाही सामोरे जात आहे. तरुण पिढीसोबत ज्येष्ठही यामध्ये सहभागी झाले आहेत.

- कल्याणी दुर्गा रवींद्र, सहभागी आंदोलक