शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना केली मग साहित्याचा विसर का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:13 IST

नवीन वर्षात तरी मुहूर्त लागणार का? लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मराठी विश्वकोश निर्मिती ...

नवीन वर्षात तरी मुहूर्त लागणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या दोन्ही मंडळांची पुनर्रचना लवकरात लवकर करण्याचे आश्वासन मराठी भाषा मंत्र्यांनी देऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापही दोन्ही संस्थांच्या पुनर्रचनेला मुहूर्त लागलेला नाही. या पुनर्रचनेअभावी मंडळाचे विविध उपक्रम रखडले आहेत. शासनाने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्डाची) पुनर्रचना केली मग साहित्याबाबत दुजाभाव का, असा प्रश्न साहित्य क्षेत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.

विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाचा दिलीप करंबेळकर यांनी जानेवारी २०२० च्या पहिल्या आठवड्यातच राजीनामा दिला. राजीनाम्याच्या स्वीकृतीसंदर्भात ३० जुलैला शासन निर्णय काढण्यात आला. त्यानंतर राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी देखील पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सध्या दोन्ही मंडळांचे अध्यक्षपद रिक्त आहे. सदस्यांची नियुक्ती प्रक्रियाही रखडली आहे.

तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश मंडळांची तातडीने पुनर्रचना करून अध्यक्षपदी आणि मंडळाच्या सदस्यपदी खऱ्या अर्थाने साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, मान्यवर आणि कर्तृत्वसिद्ध लेखक, संस्कृतीतज्ज्ञ आणि संस्कृतीच्या विविध क्षेत्रातील निष्ठेने कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींची निवड जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्र्यांना करण्यात आली होती. त्यानंतर सुभाष देसाई यांनी ही पुनर्रचना लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले. मात्र महाआघाडी सरकारला वर्ष झाले तरी दोन्ही मंडळांच्या पुनर्रचनेसंदर्भात काहीच कार्यवाही झालेली नाही.

चौकट

“महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्र्यांना मागणी करून तीन महिने झाले. त्याचा पाठपुरावाही करतो आहोत. दरम्यान, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना सरकारने केली. मात्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्र्वकोश मंडळ याबाबत अजूनही काहीच केले गेलेले नाही. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या हीरक महोत्सवी वर्षात हे दुर्लक्ष इष्ट नाही. सरकारने याबाबत तातडीने कृती करावी.”

- श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी

--------------------------------------