शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

पालिकेच्या खोल्या चक्क भाड्याने

By admin | Updated: August 9, 2016 02:02 IST

कर्मचारी म्हणून मिळालेल्या महापालिका वसाहतीमधील खोल्या परस्पर भाडेतत्त्वावर देण्याचा प्रकार काही कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे तपासणीत उघड झाले

पुणे : कर्मचारी म्हणून मिळालेल्या महापालिका वसाहतीमधील खोल्या परस्पर भाडेतत्त्वावर देण्याचा प्रकार काही कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. काही जणांनी पालिकेतील सेवानिवृत्तीनंतरही वसाहतींमधील खोलीचा ताबा कायम ठेवला असून, त्यांच्यासह अशा सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या चाळ खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. शहरात पालिकेच्या २९ वसाहती आहेत. पालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणून त्या बांधण्यात आल्या. दोन खोल्यांचे एक अशी सुमारे ३ हजार ४०० घरे त्यात आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या १८ हजार आहे. गेल्या अनेक वर्षांत पालिकेने कर्मचाऱ्यांसाठी म्हणून एकही वसाहत बांधलेली नाही. आहे त्या विकसित करणे शक्य असूनही केलेल्या नाहीत. त्यामुळेच या खोल्यांचे कर्मचाऱ्यांना वाटप करणाऱ्या पालिकेच्या चाळ विभागाकडे नेहमीच खोल्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते.सध्याची प्रतीक्षा यादी तब्बल ४ हजार जणांची आहे. त्यातील अनेकांनी खोल्यांसाठी अर्ज करून बरीच वर्षे झाली आहेत.खोल्यांची मागणी करून व अनेक कर्मचारी निवृत्त झाल्यानंतरही खोल्या मिळत नसल्याने प्रतीक्षा यादीतील काही जणांनी चाळ विभागाकडे तक्रार केली. स्वत: काही वसाहतींमध्ये फिरून माहिती घेतली. चाळ विभागानेही तपासणीसाठी म्हणून स्वतंत्र मोहीम राबविली. त्यात पालिकेशी काहीही संबंध नसलेली कुटुंबेही वसाहतींमध्ये राहत असल्याचे दिसून आले.त्या खोल्या ज्यांना देण्यात आल्या होत्या, त्यांनीच त्यांचे दुसरीकडे खासगी जागेवर घर झाल्यानंतर या खोल्या पालिकेच्या ताब्यात न देता त्यात परस्पर भाडेकरू ठेवले असल्याचे चौकशीत उघड झाले. खासगी मालमत्ता असूनही पालिकेच्या खोलीत राहत असलेली अशी ५० पेक्षा जास्त कुटुंबे तपासणीत आढळली आहेत.पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ते बाहेर खासगी घर घेऊन राहत असतील तर घरभाडेभत्ता मिळतो. पालिका वसाहतीत राहत असतील तर त्यांचा हा भत्ता पालिकेत जमा होतो. ज्यांनी पालिकेच्या खोल्या भाडेतत्त्वावर दिल्या आहेत, त्यांचा घरभाडेभत्ता पालिकेत जमा होत असला तरी त्यापेक्षा कितीतरी जास्त रक्कम त्यांना त्यांनी ठेवलेल्या भाडेकरूकडून मिळते. शहराच्या मध्यभागातील सानेगुरुजी नगर, राजेंद्रनगर या वसाहतींबरोबरच हडपसर व अन्य काही उपनगरांमधील वसाहतींमध्येही चाळ विभागाला असे प्रकार आढळले आहेत.पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने खोलीचा ताबा चाळ विभागाकडे देणे बंधनकारक आहे. मात्र काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तसे केलेले नाही. सेवानिवृत्त होऊनही त्यांनी खोल्यांचा ताबा सोडलेला नाही. अशी तब्बल २६ कुटुंबे आढळली आहेत. मुलाला, मुलीला पालिकेत नोकरी मिळणार आहे, पुतणी पालिकेतच आहे, तिच्या नावावर खोली करून घेत आहे अशा अनेक कारणे देत त्यांनी खोली पालिकेच्या ताब्यात देणे टाळले आहे. चाळ विभागाने या सर्व कुटुंबांना आता नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. सेवेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सेवेत नसतील तर त्यांच्याकडून खोल्यांचा त्वरित ताबा घेण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)कर्मचारी जास्त, खोल्या कमीकर्मचाऱ्यांच्या तुलनेत वसाहतींची व त्यातील खोल्यांची संख्या कमी आहे. त्यातही काही वसाहतींमधील खोल्यांमध्ये पालिकेच्या विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना ( रस्तारुंदी वगैरे) सामावून घेण्यात आले आहे. त्यांना दिलेल्या खोल्या कायमस्वरूपी देण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी भाडेही अत्यंत अल्प ठेवण्यात आले आहे. त्यामुळेही पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खोल्यांची संख्या कमी झाली आहे.पानशेत पूरग्रस्तांनाही जागाकाही वसाहतींमध्ये पानशेत पूरग्रस्तांना त्या वेळी खोल्या बांधून देण्यात आल्या. त्यासाठी वसाहतीमधील मोकळी जागा वापरण्यात आली. आता त्या खोल्या व जागाही पूरग्रस्तांच्या मालकीची झाल्यासारखीच आहे.