शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

एफटीआयआयमधील प्रभातकालीन मुख्य स्टुडिओच्या डागडुजीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:12 IST

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची साक्षीदार ठरलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधील प्रभात स्टुडिओला ९० वर्षांचा ...

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची साक्षीदार ठरलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधील प्रभात स्टुडिओला ९० वर्षांचा इतिहास आहे. जुन्या काळातील आशियामधला सर्वांत मोठा स्टुडिओ अशी ख्याती असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या पाऊलखुणा जतन करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून, प्रभातकालीन मुख्य स्टुडिओ क्रमांक एकचे नूतनीकरण आणि डागडुजी करण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय स्टुडिओतील काही बंद असलेल्या विभागांची रंगरंगोटी व साफसफाईचे काम देखील हाती घेतले आहे. हे विभाग विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुले केले जाणार आहेत.

भारतीय बोलपटांची निर्मिती करणाऱ्या ‘प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना व्ही. शांताराम, विष्णूपंत दामले, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर आणि सीताराम कुलकर्णी यां खंद्या शिलेदारांनी केली होती. कंपनीचे पुण्यात बस्तान हलविल्यानंतर एफटीआयआयच्या परिसरात ‘प्रभात फिल्म स्टुडिओ’ची निर्मिती केली. या स्टुडिओ’ने भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ अनुभवला. याविषयी प्रभात स्टुडिओचे संस्थापक विष्णूपंत दामले यांचे नातू अनिल दामले म्हणाले, प्रभात स्टुडिओच्या डागडुजीसाठी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी पावले उचलल्याचा खूप आनंद आहे. स्टुडिओतील अनेक विभाग काही वर्षे वापरात नसल्यामुळे बंद होते. हेच विभाग पुन्हा उघडले आहे. त्याच्या साफसफाईचे आणि त्यात असलेल्या साहित्याच्या डागडुजीचे काम एफटीआयआयकडून करण्यात येत आहे. या विभागांमध्ये शुटिंगसाठी लागणारे दिवे ठेवण्यात आले होते. त्यात प्रभात काळातील दिव्यांचाही समावेश आहे. ते सगळे दिवे साफ करून व्यवस्थितपणे ठेवण्याबरोबरच मुख्य स्टुडिओमध्ये छायाचित्रणासाठी एक विभाग आणि त्याच्याजवळ प्रभातकालीन जी प्रयोगशाळा होती. तो भागही वापरात नव्हता. येथे साफसफाई व रंगरंगोटी करून त्यांनी कार्यालयीन उपयोगासाठी वापरले जाणार आहे. स्टुडिओच्या आत पाण्याचा हौद होता. येथेही अनेक चित्रपटांचे शुटिंग झालेले असून, हौदातील कारंजे बंद पडले होते. त्याला नवीन रुप दिले जात आहे. हौदातील पाईपलाईन बदलण्यात येत आहे.

------

प्रभात स्टुडिओच्या मूळ वास्तूला कोणताही धक्का न लावता त्याचा कायापालट न करता केवळ त्यातील बंद असलेले वेगवेगळे विभाग कसे वापरता येईल, याचा विचार करून एफटीआयआयकडून डागडुजी केली जात आहे. स्टुडिओत होणाऱ्या बदलांबद्दल नेहमीच एफटीआयआयकडून माहिती दिली जाते आणि सूचना मागविल्या जातात. जुन्या काळातील हा एकमेव स्टुडिओ आहे जो आजही वापरात आहे. त्यामुळे त्याचे जतन होणे आवश्यक आहे.

- अनिल दामले, नातू, विष्णूपंत दामले (प्रभात स्टुडिओचे संस्थापक)

---

भारतीय चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक वारसा ‘प्रभात स्टुडिओ’लाभला आहे. या वास्तूला हेरिटेज दर्जा देखील आहे. ही वास्तू जतन करणे हाच यामागील उद्देश आहे.

- भूपेंद्र कँथोला, संचालक एफटीआयआय

फोटो - तन्मय ठोंबरे फोल्डरमध्ये)