शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

३४ गावांचा प्रश्न निकाली काढा

By admin | Updated: July 9, 2016 03:49 IST

शहरालगत असलेल्या हवेली व मुळशी या तालुक्यांतील ३४ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय तीन महिन्यांत निकाली काढा, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने

पुणे : शहरालगत असलेल्या हवेली व मुळशी या तालुक्यांतील ३४ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय तीन महिन्यांत निकाली काढा, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने सरकारला दिले.३४ गावांतील सर्वपक्षीय हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका सादर करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी झाली. मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात स्थानिक ग्रामपंचायती सक्षम नाहीत. ३४ गावांचा समावेश करण्यास पुणे महापालिका तसेच जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. राज्य शासनानेही मे २०१४मध्ये या गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याचा आदेश काढला आहे. मात्र, अद्याप शासन हा निर्णय घेत नसल्यामुळे हवेली तालुका नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी २९ जून रोजी सुनावणी झाली होती तेव्हा, ८ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी झाली, तेव्हा सरकारी वकील अ‍ॅड. ठाकूर यांनी वेळ मागून घेतला. त्यानंतर पुन्हा ३ वाजता सुनावणी झाली. यात शासनाचे उपसचिव डॉ. सुधाकर शिंदे यांचे मुदतवाढ मागणीचे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. यात शासन स्तरावर या प्रकरणी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा निर्णय व्यापक स्वरूपाचा आहे. अनेक तांत्रिक समस्याही उद्भवत आहेत. या सर्व अडचणींचे निराकारण करून आवश्यक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर आणखी कालावधी लागेल. त्यामुळे उच्च न्यायालयाने किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती करण्यात आली.यावर न्यायालयाने सदर पत्र रेकॉर्डवर घेऊन तीन महिन्यात अंतिम आदेश देण्याच्या सूचना दिल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. संदीप साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुनावणीच्या वेळी कृती समितीच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, राजाभाऊ रायकर, बाळासाहेब हागवणे, संदीप तुपे, मिलिंद पोकळे आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)निवडणूक आयोगाकडे जाऊजिल्हा परिषद निवडणुका आल्या असून, गट-गणांच्या रचनेचे काम शासनस्तरावर सुरू आहे. निकाल लागेपर्यंत ही रचना होईल, याबाबत जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांना विचारले असता, ते म्हणाले, की ३४ गावे वगळण्याचा मी स्वत: जिल्हा परिषदेत ठराव मांडून तो करून घेतला आहे. त्यामुळे जर या ३४ गावांचा निवडणूक प्रक्रियेत समावेश करून घेतला, तर निवडणूक आयोगाकडेही आम्ही जाण्याची तयारी करीत आहोत.उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने शासनाला ही ३४ गावे महापालिकेत घ्यावी लागतील. आम्ही त्याचा पाठपुरावा करू, असे कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले.