शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

३४ गावांचा प्रश्न निकाली काढा

By admin | Updated: July 9, 2016 03:49 IST

शहरालगत असलेल्या हवेली व मुळशी या तालुक्यांतील ३४ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय तीन महिन्यांत निकाली काढा, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने

पुणे : शहरालगत असलेल्या हवेली व मुळशी या तालुक्यांतील ३४ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय तीन महिन्यांत निकाली काढा, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने सरकारला दिले.३४ गावांतील सर्वपक्षीय हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका सादर करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी झाली. मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात स्थानिक ग्रामपंचायती सक्षम नाहीत. ३४ गावांचा समावेश करण्यास पुणे महापालिका तसेच जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. राज्य शासनानेही मे २०१४मध्ये या गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याचा आदेश काढला आहे. मात्र, अद्याप शासन हा निर्णय घेत नसल्यामुळे हवेली तालुका नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी २९ जून रोजी सुनावणी झाली होती तेव्हा, ८ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी झाली, तेव्हा सरकारी वकील अ‍ॅड. ठाकूर यांनी वेळ मागून घेतला. त्यानंतर पुन्हा ३ वाजता सुनावणी झाली. यात शासनाचे उपसचिव डॉ. सुधाकर शिंदे यांचे मुदतवाढ मागणीचे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. यात शासन स्तरावर या प्रकरणी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा निर्णय व्यापक स्वरूपाचा आहे. अनेक तांत्रिक समस्याही उद्भवत आहेत. या सर्व अडचणींचे निराकारण करून आवश्यक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर आणखी कालावधी लागेल. त्यामुळे उच्च न्यायालयाने किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती करण्यात आली.यावर न्यायालयाने सदर पत्र रेकॉर्डवर घेऊन तीन महिन्यात अंतिम आदेश देण्याच्या सूचना दिल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. संदीप साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुनावणीच्या वेळी कृती समितीच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, राजाभाऊ रायकर, बाळासाहेब हागवणे, संदीप तुपे, मिलिंद पोकळे आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)निवडणूक आयोगाकडे जाऊजिल्हा परिषद निवडणुका आल्या असून, गट-गणांच्या रचनेचे काम शासनस्तरावर सुरू आहे. निकाल लागेपर्यंत ही रचना होईल, याबाबत जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांना विचारले असता, ते म्हणाले, की ३४ गावे वगळण्याचा मी स्वत: जिल्हा परिषदेत ठराव मांडून तो करून घेतला आहे. त्यामुळे जर या ३४ गावांचा निवडणूक प्रक्रियेत समावेश करून घेतला, तर निवडणूक आयोगाकडेही आम्ही जाण्याची तयारी करीत आहोत.उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने शासनाला ही ३४ गावे महापालिकेत घ्यावी लागतील. आम्ही त्याचा पाठपुरावा करू, असे कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले.