शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

भराव काढा, अन्यथा पूर आल्यास तुम्हीच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खांब उभे करण्यासाठी नदीपात्रात ठिकठिकाणी केलेले भराव तत्काळ काढून टाकावेत, अन्यथा पूर येऊन वस्त्यांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खांब उभे करण्यासाठी नदीपात्रात ठिकठिकाणी केलेले भराव तत्काळ काढून टाकावेत, अन्यथा पूर येऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने महामेट्रो कंपनीला दिला आहे.

जलसंपदाचे अधीक्षक अभियंता स. द. चोपडे यांनी यासंबंधीचे पत्र महामेट्रोला दिले आहे. नदीपात्रात मेट्रोचे खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी नदीपात्रात तात्पुरता भराव टाकण्यात येतो. पावसाळ्यात धरणातून नदीचे पाणी सोडले जाते. भराव असेल तर पाण्याचा फुगवटा वाढून पाणी परिसरातील वसाहतींमध्ये शिरते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा भराव काढून टाकणे गरजेचे असते. डेक्कन तसेच संगम पुलाजवळचा भराव अद्याप काढला गेला नाही. त्याची दखल घेऊन जलसंपदाने हा इशारा दिला आहे.

महामेट्रोचे जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, आम्ही गेली ३ वर्षे नेहमीच पावसाळ्यापूर्वी भराव काढून टाकत असतो. याही वेळी ते काम सुरू आहे. १५ जूनच्या आधी सर्व ठिकाणचे भराव काढणे अपेक्षित असते. त्याप्रमाणे शिल्लक राहिलेले भरावही काढण्यात येतील. खांब तसेच मेट्रोचे अन्य काम करण्यासाठी म्हणून नदीपात्रात हे तात्पुरते भराव घालण्यात येतात. काम संपले की ते कायमस्वरूपी काढून टाकले जातात. जलसंपदाने निर्देश केलेले भरावही १५ जूनपूर्वी काढले जातील.