नारायणगाव : गाळा ताब्यात घेण्याच्या प्रकरणात जामीनावर मुक्तता करण्यात आलेल्या १८ जणांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने जुन्नर न्यायालयात करण्यात आली होती़ या अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे. जर जामीन रद्द झाला तरी १८ जणांना अटक करण्याचा मार्ग सुकर होणार होता. मात्र दि़ १४ डिसेंबरपर्यंत खेड सत्र न्यायालयाने दिलेला अंतरीम (तात्पुरता) जामीन असल्याने व सत्र न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत या १८ जणांना तात्पुरता दिलासा राहणार आहे़ गाळा ताबा घेण्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी प्रथम राईटचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात १८ जणांना दि़ १७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती़ या सर्वांना जुन्नर न्यायालयाने जामीन दिला होता.़ त्यानंतर तपासामध्ये मिळालेल्या पुराव्याआधारे नारायणगाव पोलिसांनी या १८ जणांसह एकूण ३१ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता़ यामध्ये ग्रामपंचायतीचे ११ कर्मचारी व सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश आहे़ ११ कर्मचाऱ्यांना दि़ ३० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने सध्या हे सर्वजण येरवडा कारागृहात आहेत़ त्यांच्या जामीनावर दि़ ८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
‘त्या’ १८ जणांना तात्पुरता दिलासा
By admin | Updated: December 7, 2015 00:16 IST