शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

परतीच्या पावसाने भात उत्पादकांना दिलासा

By admin | Updated: September 23, 2015 03:36 IST

राज्यात मुसळधार पावसअभावी रखडलेल्या भातपेरण्या पूर्ण होऊन त्यांची टक्केवारी आता शंभरपर्यंत आली आहे. खरिपाच्या एकूण ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून,

पुणे : राज्यात मुसळधार पावसअभावी रखडलेल्या भातपेरण्या पूर्ण होऊन त्यांची टक्केवारी आता शंभरपर्यंत आली आहे. खरिपाच्या एकूण ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, नीचांकी पेरणीचे संकट सध्याच्या पावसामुळे टळले आहे. राज्यात खरिपाच्या हंगामात १ कोटी ४३ लाख ५६ हजार २०० हेक्टरवर पिके घेतली जातात. आजवर १ कोटी ३२ लाख ९७ हजार २०० हेक्टरवर म्हणजे ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात तृणधान्ये ७७ टक्के, कडधान्ये ८१ व तेलबिया १२१ टक्के असे प्रमाण आहे. कापसाचे ३३ लाख ५६ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असून, कापसाची लागवड ११४ टक्के क्षेत्रावर झाली आहे. उसाची १६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाअभावी भाताच्या आॅगस्टपर्यंत केवळ ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या होत्या. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर कडधान्ये व तेलबियांच्या पेरण्या वाढल्या. भातासह ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांचा तृणधान्यांत समावेश असून ज्वारी ३९, बाजरी ५६ तर नाचणी ७८ टक्के क्षेत्रावर पेरण्यात आली आहे. मका १२८ टक्के, अन्य तृणधान्ये ७९ टक्के असे पेरण्यांचे ताजे चित्र आहे. खरीप तेलबियांचे ३३ लाख ९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र आहे. तेलबियांपैकी भुईमुगाची पेरणी ६४ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. तीळ ३१ टक्के, कारळ ३५ टक्के, सूर्यफू ल १३ टक्के असे प्रमाण असून, शेतकऱ्यांना अधिक भाव मिळवून देणाऱ्या सोयाबीनची तब्बल १३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. २७ लाख ९९ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असताना ३७ लाख ७३ हजार ९०० वर पेरणी झाली आहे. खरीप तेलबियांचे एकूण पेरणी क्षेत्र त्यामुळे १२१ टक्क्यांपर्यंत गेले आहे. पावसाने दोनदा मारलेल्या दडीमुळे यंदा खरिपाचे उत्पादन कमी येण्याची भीती व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)