शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

कोरोनाने रोजगार हिरावलेल्यांना रोजगार हमी योजनेचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

पुणे : कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार गेले. या बेरोजगारांना जिल्ह्यात रोजगार हमी योजनांच्या कामांनी दिलासा दिला ...

पुणे : कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार गेले. या बेरोजगारांना जिल्ह्यात रोजगार हमी योजनांच्या कामांनी दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील मजुरांबरोबर इतर जिल्ह्यातील मजुरांनाही या अंतर्गत रोजगार मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात ७८४ रोहयोची कामे सुरू असून त्या अंतर्गत ४ हजार २६३ मजुरांना काम मिळाले आहे.

कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनचा फटका सर्वाधिक असंघटीत कामगारांना बसला. कामे, तसेच उद्योग बंद झाल्याने अनेक मजूर परगावी परतले. यात परराज्यातील मजुरांचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेल्यांना पुन्हा काम मिळावे या हेतुने जिल्हा परिषदेने रोहयोची कामे पुन्हा सुरू करत ग्रामपंचायतींना या मजुरांना या अंतगर्गत काम देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच या वर्षी परराज्यातील मजुरांनाही या योजने अंतर्गत काम देण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचना केल्या होत्या.

पानंद रस्यांची कामे, अंतर्गत रस्यांची कामे, पाणी योजनांची कामे ग्रामपंचायती अंतर्गत सुरू आहेत. यावर रोहयो अंतर्गत मजुरांना कामे दिली गेली आहे. दिवसाला साधारण २०० ते २२५ रुपये मोबदला कामाचा दिला जात आहे. या वर्षी जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोडणी कामगारांनाही रोहयोमुळे रोजगार मिळाला आहे.

--------

तीन वर्षे किसानसभा कामासाठी लढा देत होती, तेव्हा कुठे पहिल्यांदा यावर्षी हाताला काम मिळाले. बोरघर परिसरातील १७० लोकांची रोजगारासाठी मागणी होती, यापैकी सुरू असलेल्या उंबरवाडी, घोडवाडी, काळेवाडी या रस्त्याच्या कामावर सध्या ५५ लोक काम करत आहेत. एकदम चांगले काम सुरू असून मागील दोन आठवड्यांचे काम पाहिले असताना साधारण २०० ते २२५ रुपये रोज पडला आहे.

- राजू घोडे, रोहयो कर्मचारी

------

दरवर्षी भात कापणी व झोडणी झाल्यानंतर हाताला काम मिळत नव्हते. परंतु यावर्षी काम मिळाल्याने गाव सोडून बाहेर गावी कामावर जाण्याची वेळ आली नाही. ग्रामस्थांनी रस्ते, तलाव व विहिरीतील गाळ काढणे, भात शेती दुरूस्ती अशी अनेक कामे सुचवली आहेत, ही सर्व कामे मिळाल्यास वर्षभर पुरेल एवढे काम गावात मिळेल.

- दीपक वालकोळी, रोहयो कर्मचारी

--------

परराज्यातील कर्मचाऱ्यांना रोहयोग समाविष्ट करण्यासाठी केल्या सूचना

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. यात परराज्यातील मजुरांचा मोठा समावेश होता. या सोबतच परजिल्ह्यातील मजुरांची संख्याही जास्त होती. यामुळे ज्या ठिकाणी आैद्योगिक वसाहत आहे, येथील ग्रामपंचायतींना अशा मजुरांना रोहयो अंतर्गत काम देण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्ह्यात ग्रामपंचायतींद्वारे अशी कामे सुरू असून मजुरांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.

आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद