शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

कोरोनाने रोजगार हिरावलेल्यांना रोजगार हमी योजनेचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

पुणे : कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार गेले. या बेरोजगारांना जिल्ह्यात रोजगार हमी योजनांच्या कामांनी दिलासा दिला ...

पुणे : कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार गेले. या बेरोजगारांना जिल्ह्यात रोजगार हमी योजनांच्या कामांनी दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील मजुरांबरोबर इतर जिल्ह्यातील मजुरांनाही या अंतर्गत रोजगार मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात ७८४ रोहयोची कामे सुरू असून त्या अंतर्गत ४ हजार २६३ मजुरांना काम मिळाले आहे.

कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनचा फटका सर्वाधिक असंघटीत कामगारांना बसला. कामे, तसेच उद्योग बंद झाल्याने अनेक मजूर परगावी परतले. यात परराज्यातील मजुरांचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेल्यांना पुन्हा काम मिळावे या हेतुने जिल्हा परिषदेने रोहयोची कामे पुन्हा सुरू करत ग्रामपंचायतींना या मजुरांना या अंतगर्गत काम देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच या वर्षी परराज्यातील मजुरांनाही या योजने अंतर्गत काम देण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचना केल्या होत्या.

पानंद रस्यांची कामे, अंतर्गत रस्यांची कामे, पाणी योजनांची कामे ग्रामपंचायती अंतर्गत सुरू आहेत. यावर रोहयो अंतर्गत मजुरांना कामे दिली गेली आहे. दिवसाला साधारण २०० ते २२५ रुपये मोबदला कामाचा दिला जात आहे. या वर्षी जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोडणी कामगारांनाही रोहयोमुळे रोजगार मिळाला आहे.

--------

तीन वर्षे किसानसभा कामासाठी लढा देत होती, तेव्हा कुठे पहिल्यांदा यावर्षी हाताला काम मिळाले. बोरघर परिसरातील १७० लोकांची रोजगारासाठी मागणी होती, यापैकी सुरू असलेल्या उंबरवाडी, घोडवाडी, काळेवाडी या रस्त्याच्या कामावर सध्या ५५ लोक काम करत आहेत. एकदम चांगले काम सुरू असून मागील दोन आठवड्यांचे काम पाहिले असताना साधारण २०० ते २२५ रुपये रोज पडला आहे.

- राजू घोडे, रोहयो कर्मचारी

------

दरवर्षी भात कापणी व झोडणी झाल्यानंतर हाताला काम मिळत नव्हते. परंतु यावर्षी काम मिळाल्याने गाव सोडून बाहेर गावी कामावर जाण्याची वेळ आली नाही. ग्रामस्थांनी रस्ते, तलाव व विहिरीतील गाळ काढणे, भात शेती दुरूस्ती अशी अनेक कामे सुचवली आहेत, ही सर्व कामे मिळाल्यास वर्षभर पुरेल एवढे काम गावात मिळेल.

- दीपक वालकोळी, रोहयो कर्मचारी

--------

परराज्यातील कर्मचाऱ्यांना रोहयोग समाविष्ट करण्यासाठी केल्या सूचना

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. यात परराज्यातील मजुरांचा मोठा समावेश होता. या सोबतच परजिल्ह्यातील मजुरांची संख्याही जास्त होती. यामुळे ज्या ठिकाणी आैद्योगिक वसाहत आहे, येथील ग्रामपंचायतींना अशा मजुरांना रोहयो अंतर्गत काम देण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्ह्यात ग्रामपंचायतींद्वारे अशी कामे सुरू असून मजुरांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.

आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद