शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

पावसामुळे पिकांना दिलासा

By admin | Updated: October 28, 2015 01:11 IST

खेडच्या पूर्व, तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात परतीच्या वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पेरणीयुक्त हरभरा, ज्वारी पिकांना दिलासा मिळाला आहे

शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व, तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात परतीच्या वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पेरणीयुक्त हरभरा, ज्वारी पिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे कांदापिकाचेही सिंचन होण्यास मदत होणार आहे. मात्र, हवामानात बदल झाल्याने याचा परिणाम पिकांवर होत आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने हातची पिके जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल घडून कमालीची उष्णता तयार होऊन, पावसासारखी परिस्थिती निर्माण होत होती. सोमवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे वळवाच्या पावसाची चाहूल लागली होती. अखेर रात्री एक ते दीडच्या सुमारास पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या ढगांमधून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हळूवार कोसळणारा वरुणराजा अल्प कालावधीतच जोरात सुरू झाला. सुमारे एक तास पडलेल्या वळवाच्या पावसाने चौफुला, वाजेवाडी, मांजरेवाडी, साबळेवाडी, मोहितेवाडी, बहुळ, सिद्धेगव्हाण, नवीनगाव, चिंचोशी आदी परिसरातील शेतांमध्ये पाणीच पाणी केले.चालू पावसाळी हंगामात वरुणराजाची बरसण्यास दीर्घ प्रतीक्षा करायला लावली होती. मात्र, उशिरा का होईना, परंतु मुबलक प्रमाणात पावसाची कृपा झाल्याने पाण्याचे स्रोत गच्च भरून खळखळू लागले आहेत.परिणामी, पाण्याची चिंता दूर होऊन रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ईशान्य मोसमी पावसाच्या शिडकाव्याने पावसाळी हंगामात चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सुखद धक्का देऊन धरणीमातेचीही तृष्णा भागविल्याने रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू, ज्वारी ही महत्त्वाची पिके यशस्वीरीत्या उत्पादित करण्याच्या आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. (वार्ताहर)