शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन कशाळवाडीतच करा!

By admin | Updated: November 10, 2014 22:52 IST

माळीणचे पुनर्वसन कशाळवाडीतच करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत, तर कशाळवाडीच्या जागेला जीएसआयची मान्यता घेणो आवश्यक आहे.

घोडेगाव  : माळीणचे पुनर्वसन कशाळवाडीतच करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत, तर कशाळवाडीच्या जागेला जीएसआयची मान्यता घेणो आवश्यक आहे.  तेथे 6 ते 8 एकर जागा उपलब्ध झाली पाहिजे व जागामालाकांनी जागा दिली पाहिजे अशा अडचणी आहेत. त्या ऐवजी झांजरेवाडीत जागाही उपलब्ध आहे व जीएसआयने मान्यताही दिली आहे, त्यामुळे येथे चांगले पुनर्वसन होऊ शकते, असे मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मांडले.
घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत माळीण पुनर्वसनासाठी जागा निश्चित करणो, रोजगार व इतर विषयांवर रविवारी बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी सौरभ राव, प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, आदिवासी प्रकल्प अधिकारी टी.एम. पिचड, तहसीलदार बी.जी. गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे इत्यादी उपस्थित होते.
बैठकीत जागा निश्चित करण्याबाबत ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात चर्चा झाली. पुनर्वसन करण्यासाठी 6 ते 8 एकर जागा आवश्यक असून, यामध्ये 72 घरे बांधली जाणार आहेत. अडिवरे, झांजरेवाडी, कोकणोवाडी व कशाळवाडी अशा चार जागा पाहण्यात आल्या होत्या. अडिवरेची जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे, तर कोकणोवाडीची जागा लांब असल्यामुळे ती नाकारण्यात आली आहे.
झांजरेवाडी जागेला जीएसआयने  सकारात्मक अहवाल दिला आहे. तसेच झांजरेवाडीमध्ये आवश्यक जागा मिळाली आहे; मात्र ती उंच डोंगरावर असल्यामुळे वाहतूक, रहदारी व शेतीसाठी अडचणीची होणार आहे. त्यामुळे झांजरेवाडीत पुनर्वसन करू नये तर कशाळवाडीत पुनर्वसन झाल्यास सगळ्यांना सोईस्कर होईल, अशी भूमिका ग्रामस्थांनी बैठकीत मांडली.  
ग्रामस्थांची मागणी कशाळवाडीत असेल तर या जागेबाबत प्रशासनाने विचार करावा. ही जागा जीएसआयला दाखवून घ्यावी जर त्यांनी सकारात्क अहवाल दिल्यास येथील जागामालकांशी चर्चा करून जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे वळसे पाटील यांनी या वेळी सांगितले. पुढील आठ दिवसांत जीएसआयला जागा दाखवून घ्यावी व यानंतर जागा निश्चित केली जाईल, असा या बैठकीत शेवटी निर्णय झाला. 
माळीणमधील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी तीन वेळा रोजगार मेळावे घेण्यात आले. यामध्ये 47 पैकी 5 जणांनी नोकरी स्वीकारली तर 15 जणांनी वेगवेगळ्या कंपन्यांनी नोकरीसाठी पत्रे पाठविली आहेत.  2क् जाणांनी पगार कमी, वैयक्तिक अडचणीमुळे नोकरी नाकारली आहे. नोकरी नाकारलेल्यांच्या अडचणी समजून घेऊन मार्ग काढला जाईल व सोईच्या नोक:या दिल्या जातील, असे या वेळी जिल्हाधिका:यांनी सांगितले. (वार्ताहर)
 
माळीण दुर्घटनेत 151 लोक मृत्युमुखी पडले. यापैकी 146 जणांचे मृतदेह सापडले व 5 जणांचे मृतदेह सापडले नाहीत. हे 5 मृतदेह न सापडल्यामुळे त्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळू शकली नाही. या व्यक्ती मृत घोषित करून त्यांची मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी या वेळी वारसांनी केली. अशा व्यक्ती मृत घोषित करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला आहेत. प्रशासनाचा न्यायालयाकडे पाठपुरवा सुरू आहे. पुढील एक महिन्याच्या आत मदत दिली जाईल, असे प्रांत अधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले.