शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसविल्यास उद्रेक

By admin | Updated: January 10, 2017 04:00 IST

छत्रपती संभाजीमहाराज यांच्याविषयी विकृत लेखन करणारे राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात उद्रेक होईल

पुणे : छत्रपती संभाजीमहाराज यांच्याविषयी विकृत लेखन करणारे राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात उद्रेक होईल. मराठा मोर्चांचे रूपांतर क्रांती मोर्चांमध्ये होईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संभाजी उद्यानात संभाजीमहाराज यांचाच पुतळा बसविला पाहिजे. हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, अशी मागणीही करण्यात आली.संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पत्रकार परिषदेत गडकरी पुतळा काढण्यामागील भूमिका स्पष्ट केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आदी उपस्थित होते.संभाजी ब्रिगेडने गेली १०-१२ वर्षे हा पुतळा हटवावा, यासाठी पाठपुरावा केला होता. तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी वैयक्तिक भूमिकेतून तो काढून टाकावा, यासाठी उद्यान विभागाला पत्र लिहिले होते. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. कार्यकर्त्यांनी या दिरंगाईमुळे स्वत:च पुतळा काढला. त्यांचा आम्हाला अभिमान असून आम्ही ती जबाबदारी स्वीकारली आहे.’’निवडणूक लक्षात घेऊन गडकरी पुतळा हा विषय संभाजी ब्रिगेडने चर्चेत आणल्याची चर्चा खरी नाही. संघटना पुतळ्याचा आधार घेऊन राजकारण करण्याएवढी कमकुवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व महापौर प्रशांत जगताप यांनी गडकरींचा पुतळा परत बसविण्याचे किंवा तैलचित्र बसविण्याचे जाहीर केले असल्यामुळे गडकरींच्या लेखनाला या पक्षाचे समर्थन असल्याचे दिसून येते, असे शिंदे यांनी सांगितले.वयाच्या १४व्या वर्षी ‘बुधभूषणम्’सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारे संभाजीमहाराज आदर्श राजा कसा असावा असे लिहीत असतील, तर त्यांचे चारित्र्य शुद्धच असले पाहिजे. एकही लढाई ते हरले नाहीत. गडकरींनी रंगविलेल्या तुळसा या काल्पनिक पात्राचे थडगे पन्हाळा गडावर नसल्याचे संशोधकांना  दिसून आले आहे, असे मिटकरी यांनी नमूद केले.(प्रतिनिधी)