शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्ह्यातच पुनर्वसन

By admin | Updated: December 17, 2014 05:37 IST

गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्हे तालुक्यातच पुनर्वसन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन झाल्यास गुजवणी धरणात पा

पुणे: गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्हे तालुक्यातच पुनर्वसन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन झाल्यास गुजवणी धरणात पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा होणार असून, यामुळे पुरंदरचा पाण्याचा प्रश्नदेखील सुटण्यास मदत होणार आहे.पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरणारे गुंजवणी धरण बांधून चार वर्षे पूर्ण झाले तरी अद्याप धरणांमध्ये पाणी साठविण्यात आलेले नाही. धरणांमध्ये पाणी साठविल्यास पाण्याच्या फुगावड्यामुळे काही घरे पाण्याखाली येतात. यामुळे प्रथम या लोकांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने येथील सुमारे ८५ प्रकल्पग्रस्तांना शिरुर आणि दौंड तालुक्यात जमिनी देऊ केल्या आहेत, पण प्रकल्पग्रस्तांनी या जमिनी घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी वेल्हे तालुक्यातच आपले पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात येथील ८५ प्रकल्पग्रस्तांना गुंजवणी धरणाच्या खालील बाजूस घरांसाठी प्लॉट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रकल्पा पासून आठ किलोमीटरमध्ये शेतीसाठीची जमीन देण्यात येणार आहे. या लोकांचे पुनर्वसन झाल्यास धरणांमध्ये पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा होणार असून, धरणामध्ये तीन टीएमसी पाणी साठविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.धरणातील कालव्यामुळे वेल्हे तालुक्यातील १८ गावातील १३०२ हेक्टर व भोर तालुक्यातील ३७ गावातील १३८७५ हेक्टर अशी १५ हजार १७७ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. वेल्हे तालुक्यातील १८ गावांना तर भोर तालुक्यातील ३७ गावांना लाभीमळणार आहे. . मात्र कालव्याची कामे कधी पुर्ण होणार आणि लोकांना पाणी कधी मिळणार. (प्रतिनिधी)