शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

धनकवडीत ट्रक टर्मिनसच्या जागेवर विस्थापितांचे पुनर्वसन

By admin | Updated: October 4, 2016 01:55 IST

विकास आराखड्यात ट्रक टर्मिनससाठी ठेवलेली आरक्षित जागा प्लॉट पाडून त्याचे पैसे घेऊन व्यावसायिकांना देण्याचा प्रकार पालिका प्रशासनाने केला आहे.

पुणे : विकास आराखड्यात ट्रक टर्मिनससाठी ठेवलेली आरक्षित जागा प्लॉट पाडून त्याचे पैसे घेऊन व्यावसायिकांना देण्याचा प्रकार पालिका प्रशासनाने केला आहे. एक- दोन नव्हे, तर चक्क ९९ वर्षांच्या कराराने सुमारे ५६ जणांना १०० ते साडेसातशे चौरस फुटांच्या जागा देण्यात आल्या आहेत. याशिवाय खुद्द महापालिकेनेही या जागेवर काही प्रकल्प सुरू केले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सन २००६ मध्ये स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या संमतीने करण्यात आला आहे.धनकवडी येथील वादग्रस्त के.के. मार्केटच्या जागेजवळ हा भूखंड आहे. तो १९८७ च्या विकास आराखड्यात ट्रक टर्मिनससाठी राखीव दाखविण्यात आला आहे. अशा प्रकारे विशिष्ट कारणासाठी राखीव भूखंडावर कसलेही अतिक्रमण होऊ नये, यासाठी पालिकेनेच दक्षता घेणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेनेच या भूखंडावर अतिक्रमण केले आहे. या जागेचे प्लॉट पाडण्यात आले असून, ते पालिकेकडून काही व्यावसायिकांना देण्यात येत आहेत. नगरसेविका अस्मिता शिंदे यांनी याबाबत प्रशासनाकडे माहिती मागितली होती. त्यांना दिलेल्या उत्तरात प्रशासनाने ५२ व्यावसायिकांची यादीच दिली आहे. १०० ते ४०० चौरस फुटांची जागा त्यांना ९९ वर्षांच्या कराराने भाडेपट्ट्याने दिली आहे.एकूण ४ व्यावसायिकांना तर तब्बल ७३२ चौरस फुटांची जागा देण्यात आली आहे. त्यासाठी या सर्व व्यावसायिकांकडून पालिकेने पैसे घेतले आहेत. यातील बहुसंख्य गॅरेज आहेत. त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांची या जागेवर कायम गर्दी असते. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत बाधित झालेले, रस्त्यावर व्यवसाय असलेल्यामुळे पालिकेने ते काढायला लावल्याने विस्थापित झालेल्या अशांना या जागा देण्यात आल्या आहेत. या सगळ्या व्यावसायिकांनी एकूण भूखंडाचा बराचसा भाग व्यापला आहे. ते कमी म्हणून की काय सन २००९ ते सन २०११ या दरम्यान खुद्द पालिकेनेच या जागेवर तीन प्रकल्प सुरू केले आहेत. सन २०११ मध्ये बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत असलेला ५ टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प येथे सुरू झाला. याशिवाय गांडूळ खत प्रकल्प आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करण्यासाठी एक खास शेडही या जागेवर पालिकेने काही वर्षांपूर्वी बांधली आहे. या तीनही प्रकल्पांसाठी बरीच मोठी जागा गेली आहे. धनकवडी परिसरात कायम मोठ्या, अवजड वाहनांची गर्दी असते. भविष्यात ती आणखी वाढणार, हे लक्षात घेऊनच सन १९८७ मध्ये हा मोठा भूखंड मालमोटारींचा नाका म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे. राखीव भूखंड तो ज्या कारणासाठी राखीव ठेवण्यात आला आहे, त्या कारणांसाठी विशिष्ट वर्ष वापर झाला नाही, तर तो मूळ मालकाला परत करावा, अशी कायद्यात तरतूद आहे. याची माहिती असताना पालिका प्रशासन राखीव भूखंडाचा वेगळा वापर करीत असून, त्यावर पैसेही स्वीकारत आहे.