शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० टक्के अनुदान हवे

By admin | Updated: July 7, 2017 03:01 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत अनेक त्रुटी आहेत. त्या भरून न काढल्यास अनेक शेतकऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत अनेक त्रुटी आहेत. त्या भरून न काढल्यास अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती व्यक्त करून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान  दिले पाहिजे, अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे  येथील शेतकऱ्यांनी माजी केंद्र्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करताना केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी  बोलून त्रुटी दूर करव्यात, असेही त्यांनी सांगितले.  पुणतांबे येथील किसान क्रांती जनआंदोलनाच्या शेतकरी प्रतिनिधींनी शरद पवार यांची माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात अभय चव्हाण, अमोल टेके, संभाजी डोके, पाराजी वरकडे, बाळासाहेब वाणी, मधुुकर पेटकर, सचिन ढोरडे, विलास पेटकर आदींचा समावेश होता. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी आहेत. अनेक निकषांमुळे शेतकरी कर्जमाफीच्या धोरणावर समाधानी नसल्याचे या शिष्टमंडळाने सांगितले. कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये सन २०१२ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही. सन २०१२ ते १६ या कालावधीत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देऊ केली आहे हे जरी खरी असले, तरी ३० जून २०१६ ते ३० जून २०१७ या कालावधीत थकीत राहिलेल्या शेतकऱ्यांना मात्र या कर्जमाफीत स्थान नाही. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक मुद्दल आणि व्याज असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी पैसे भरण्याची मुभा दिली आहे. याबाबत राष्ट्रीयीकृत बॅँका, नाबार्ड, रिझर्व्ह बॅँकेच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे बॅँकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज शेतकरी शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्य सरकारने कर्जमाफीच्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलन यशस्वी झाले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या धोरणात राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी मदत केली जाईल, असे शरद पवार यांनी या शेतकरी शिष्टमंडळाला सांगितले.शेतकरी कुटुंबनिहाय कर्जमाफीचे धोरणदेखील त्रासदायक आहे. ग्रामीण भागात आजही संयुक्त कुटुंबपद्धती आहे. त्यामुळे खातेदारनिहाय कर्जमाफी देण्याची गरज असल्याचे या शिष्टमंडळाने या वेळी निदर्शनास आणून दिले.