शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लोकशाही दिनामध्ये आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे संताप

By admin | Updated: January 5, 2016 02:37 IST

महिन्यातून एकदा होणाऱ्या लोकशाही दिनाला महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार गैरहजर असल्याने सोमवारी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला

पुणे : महिन्यातून एकदा होणाऱ्या लोकशाही दिनाला महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार गैरहजर असल्याने सोमवारी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. लोकशाही दिनावर बहिष्कार टाकून त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी प्रशासनाला अखेर पोलिसांची कुमक मागवावी लागली. आयुक्त पालिकेत आल्यानंतर त्यांनी लोकशाही दिनाचा कार्यक्रम घेतला.महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिकेमध्ये लोकशाही दिन घेतला जातो. नागरिकांच्या समस्यांना कुठेच काही दाद न मिळाल्यास अखेर पर्याय म्हणून लोकशाही दिनामध्ये थेट आयुक्तांकडे नागरिकांना त्यांचे गाऱ्हाणे मांडता येते. मात्र या लोकशाही दिनाला कुणाल कुमार अनेकदा उपस्थित राहू शकले नाहीत. जानेवारी महिन्यातील लोकशाही दिनासाठीही ते हजर नसल्याचे पाहून नागरिकांच्या भावना अनावर झाल्या. आयुक्तांकडील लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्यासाठी नागरिकांना अनेक टप्पे पार पाडून यावे लागते. अनेकदा हेतुपुरस्सर अधिकाऱ्यांकडून काम केले जात नाही, त्याची तक्रार आयुक्तांकडे केल्यास त्यावर काहीतरी कार्यवाही होऊ शकेल अशी नागरिकांची अपेक्षा असते. मात्र ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी आहेत, ज्यांनी काम केले नसल्यामुळे नागरिकांना आयुक्तांकडे यावे लागले तेच अधिकारी सोमवारी आयुक्तांकडील लोकशाही दिनामध्ये तक्रार घेण्यासाठी बसले होते. त्यामुळे नागरिकांनी या लोकशाही दिनामध्ये सहभागी न होता, आयुक्त आल्यानंतरच लोकशाही दिनाचा कार्यक्रम घ्यावा अशी भूमिका घेतली. त्यानुसार त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी आयुक्त महत्त्वाच्या मीटिंगनिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त आल्याशिवाय लोकशाही दिनामध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समवेतची बैठक संपवून दुपारी दोनच्या सुमारास कुणाल कुमार महापालिकेत आले. त्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. बांधकाम विभागाविषयीच्या सर्वाधिक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. त्याचबरोबर शाळेतील अतिक्रमण काढले जात नाही, रस्त्याचे काम झाले नाही, शाळेतून जीना चोरीला गेला आहे आदी तक्रारी नागरिकांनी मांडल्या. कुणाल कुमार यांनी त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आंदोलनकर्त्यांनी शेवटी त्यांचे आभार मानले.