शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही दिनामध्ये आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे संताप

By admin | Updated: January 5, 2016 02:37 IST

महिन्यातून एकदा होणाऱ्या लोकशाही दिनाला महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार गैरहजर असल्याने सोमवारी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला

पुणे : महिन्यातून एकदा होणाऱ्या लोकशाही दिनाला महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार गैरहजर असल्याने सोमवारी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. लोकशाही दिनावर बहिष्कार टाकून त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी प्रशासनाला अखेर पोलिसांची कुमक मागवावी लागली. आयुक्त पालिकेत आल्यानंतर त्यांनी लोकशाही दिनाचा कार्यक्रम घेतला.महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिकेमध्ये लोकशाही दिन घेतला जातो. नागरिकांच्या समस्यांना कुठेच काही दाद न मिळाल्यास अखेर पर्याय म्हणून लोकशाही दिनामध्ये थेट आयुक्तांकडे नागरिकांना त्यांचे गाऱ्हाणे मांडता येते. मात्र या लोकशाही दिनाला कुणाल कुमार अनेकदा उपस्थित राहू शकले नाहीत. जानेवारी महिन्यातील लोकशाही दिनासाठीही ते हजर नसल्याचे पाहून नागरिकांच्या भावना अनावर झाल्या. आयुक्तांकडील लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्यासाठी नागरिकांना अनेक टप्पे पार पाडून यावे लागते. अनेकदा हेतुपुरस्सर अधिकाऱ्यांकडून काम केले जात नाही, त्याची तक्रार आयुक्तांकडे केल्यास त्यावर काहीतरी कार्यवाही होऊ शकेल अशी नागरिकांची अपेक्षा असते. मात्र ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी आहेत, ज्यांनी काम केले नसल्यामुळे नागरिकांना आयुक्तांकडे यावे लागले तेच अधिकारी सोमवारी आयुक्तांकडील लोकशाही दिनामध्ये तक्रार घेण्यासाठी बसले होते. त्यामुळे नागरिकांनी या लोकशाही दिनामध्ये सहभागी न होता, आयुक्त आल्यानंतरच लोकशाही दिनाचा कार्यक्रम घ्यावा अशी भूमिका घेतली. त्यानुसार त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी आयुक्त महत्त्वाच्या मीटिंगनिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त आल्याशिवाय लोकशाही दिनामध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समवेतची बैठक संपवून दुपारी दोनच्या सुमारास कुणाल कुमार महापालिकेत आले. त्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. बांधकाम विभागाविषयीच्या सर्वाधिक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. त्याचबरोबर शाळेतील अतिक्रमण काढले जात नाही, रस्त्याचे काम झाले नाही, शाळेतून जीना चोरीला गेला आहे आदी तक्रारी नागरिकांनी मांडल्या. कुणाल कुमार यांनी त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आंदोलनकर्त्यांनी शेवटी त्यांचे आभार मानले.