शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमध्ये रजिस्टर मॅरेजचा ‘टे्रंड’

By admin | Updated: May 12, 2015 04:16 IST

लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये

नम्रता फडणीस / हिनाकौसर खान-पिंजार , पुणे‘लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये पहायला मिळत होती. यासाठी लग्नावर वारेमाप पैशाची उधळण करण्याबद्दल देखील त्यांच्या मनात ’किंतु’ असत नव्हता. आता मात्र जग बदलते आहे! एकविसाव्या युगाकडे वाटचाल करताना तरूणाईच्या विचारसरणीत कमालीचे बदल होत आहेत. विवाहपद्धतीवर विश्वास नसण्यापासून ते सध्याच्या महागाईच्या काळात लग्नाचा थाट-माट, पाहुणे मंडळींचा राबता, त्यांचे मान-पान, जेवळावळीपर्यंतचा खर्च टाळण्यासाठी झगमगत्या विवाहसोहळ्याला बगल देत नोंदणीपद्धतीने (रजिस्टर)लग्न करण्याचा ’ट्रेंड’ हळूहळू समाजात प्रस्थापित होऊ लागला आहे. मागील चार महिन्यांची आकडेवारी पाहता यापद्धतीने दिवसाला सरासरी १२-१५ ते लग्न होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पण चित्र निश्चितचं आशादायी नाही आहे का! ‘लग्न’हा मुख्यत्वे नवरा अन नवरी च्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. प्रत्येक युवापिढीने आपल्या लग्नाचे सुंदर स्वप्न पाहिलेले असते. मात्र आपल्याच स्वप्नाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहाण्याचा नवा विचार त्यांच्यामध्ये रूजत चालला आहे. लग्न, लग्नाचा पेहराव, खानपान, मानपान, नजीकच्या आप्तेष्टांसाठी विविध गिफ्टस घेणे यावर वारेमाप खर्च होतो. शिवाय पूर्वीप्रमाणे आता लग्न समारंभ हा नवरीच्या घरी किंवा अंगणात होत नाहीत. लग्नासाठी मोठमोठे हॉल्स किंवा लॉन्सच घेणे भाग पडते. यातच ‘‘लग्न’ वधूकडच्या मंडळींनी करून देण्याची प्रथा चालत आली आहे, वडिलाधाऱ्यांचा आयुष्यभराचा पैसा खर्ची जातो तर काही वेळा कर्ज ही काढावे लागतात. त्यामुळे उच्च शिक्षित मुलींना हीच प्रथाच मान्य नाही. या सर्व गोष्टी टाळण्यासाठीच नोंदणीपद्धतीने लग्न करून वायफळ खर्चाला आळा घालण्याकडे तरूणांचा कल वाढत चालला असल्याचे दिसत आहे.