शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

तरुणांमध्ये रजिस्टर मॅरेजचा ‘टे्रंड’

By admin | Updated: May 12, 2015 04:16 IST

लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये

नम्रता फडणीस / हिनाकौसर खान-पिंजार , पुणे‘लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये पहायला मिळत होती. यासाठी लग्नावर वारेमाप पैशाची उधळण करण्याबद्दल देखील त्यांच्या मनात ’किंतु’ असत नव्हता. आता मात्र जग बदलते आहे! एकविसाव्या युगाकडे वाटचाल करताना तरूणाईच्या विचारसरणीत कमालीचे बदल होत आहेत. विवाहपद्धतीवर विश्वास नसण्यापासून ते सध्याच्या महागाईच्या काळात लग्नाचा थाट-माट, पाहुणे मंडळींचा राबता, त्यांचे मान-पान, जेवळावळीपर्यंतचा खर्च टाळण्यासाठी झगमगत्या विवाहसोहळ्याला बगल देत नोंदणीपद्धतीने (रजिस्टर)लग्न करण्याचा ’ट्रेंड’ हळूहळू समाजात प्रस्थापित होऊ लागला आहे. मागील चार महिन्यांची आकडेवारी पाहता यापद्धतीने दिवसाला सरासरी १२-१५ ते लग्न होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पण चित्र निश्चितचं आशादायी नाही आहे का! ‘लग्न’हा मुख्यत्वे नवरा अन नवरी च्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. प्रत्येक युवापिढीने आपल्या लग्नाचे सुंदर स्वप्न पाहिलेले असते. मात्र आपल्याच स्वप्नाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहाण्याचा नवा विचार त्यांच्यामध्ये रूजत चालला आहे. लग्न, लग्नाचा पेहराव, खानपान, मानपान, नजीकच्या आप्तेष्टांसाठी विविध गिफ्टस घेणे यावर वारेमाप खर्च होतो. शिवाय पूर्वीप्रमाणे आता लग्न समारंभ हा नवरीच्या घरी किंवा अंगणात होत नाहीत. लग्नासाठी मोठमोठे हॉल्स किंवा लॉन्सच घेणे भाग पडते. यातच ‘‘लग्न’ वधूकडच्या मंडळींनी करून देण्याची प्रथा चालत आली आहे, वडिलाधाऱ्यांचा आयुष्यभराचा पैसा खर्ची जातो तर काही वेळा कर्ज ही काढावे लागतात. त्यामुळे उच्च शिक्षित मुलींना हीच प्रथाच मान्य नाही. या सर्व गोष्टी टाळण्यासाठीच नोंदणीपद्धतीने लग्न करून वायफळ खर्चाला आळा घालण्याकडे तरूणांचा कल वाढत चालला असल्याचे दिसत आहे.