शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

तरुणांमध्ये रजिस्टर मॅरेजचा ‘टे्रंड’

By admin | Updated: May 12, 2015 04:16 IST

लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये

नम्रता फडणीस / हिनाकौसर खान-पिंजार , पुणे‘लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये पहायला मिळत होती. यासाठी लग्नावर वारेमाप पैशाची उधळण करण्याबद्दल देखील त्यांच्या मनात ’किंतु’ असत नव्हता. आता मात्र जग बदलते आहे! एकविसाव्या युगाकडे वाटचाल करताना तरूणाईच्या विचारसरणीत कमालीचे बदल होत आहेत. विवाहपद्धतीवर विश्वास नसण्यापासून ते सध्याच्या महागाईच्या काळात लग्नाचा थाट-माट, पाहुणे मंडळींचा राबता, त्यांचे मान-पान, जेवळावळीपर्यंतचा खर्च टाळण्यासाठी झगमगत्या विवाहसोहळ्याला बगल देत नोंदणीपद्धतीने (रजिस्टर)लग्न करण्याचा ’ट्रेंड’ हळूहळू समाजात प्रस्थापित होऊ लागला आहे. मागील चार महिन्यांची आकडेवारी पाहता यापद्धतीने दिवसाला सरासरी १२-१५ ते लग्न होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पण चित्र निश्चितचं आशादायी नाही आहे का! ‘लग्न’हा मुख्यत्वे नवरा अन नवरी च्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. प्रत्येक युवापिढीने आपल्या लग्नाचे सुंदर स्वप्न पाहिलेले असते. मात्र आपल्याच स्वप्नाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहाण्याचा नवा विचार त्यांच्यामध्ये रूजत चालला आहे. लग्न, लग्नाचा पेहराव, खानपान, मानपान, नजीकच्या आप्तेष्टांसाठी विविध गिफ्टस घेणे यावर वारेमाप खर्च होतो. शिवाय पूर्वीप्रमाणे आता लग्न समारंभ हा नवरीच्या घरी किंवा अंगणात होत नाहीत. लग्नासाठी मोठमोठे हॉल्स किंवा लॉन्सच घेणे भाग पडते. यातच ‘‘लग्न’ वधूकडच्या मंडळींनी करून देण्याची प्रथा चालत आली आहे, वडिलाधाऱ्यांचा आयुष्यभराचा पैसा खर्ची जातो तर काही वेळा कर्ज ही काढावे लागतात. त्यामुळे उच्च शिक्षित मुलींना हीच प्रथाच मान्य नाही. या सर्व गोष्टी टाळण्यासाठीच नोंदणीपद्धतीने लग्न करून वायफळ खर्चाला आळा घालण्याकडे तरूणांचा कल वाढत चालला असल्याचे दिसत आहे.