शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

यवत गावात रेड अलर्ट, ११ दिवस कडकडीत बंदचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:10 IST

जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी यवत गाव हाय अलर्ट म्हणून घोषित केले आहे. गावातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन ...

जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी यवत गाव हाय अलर्ट म्हणून घोषित केले आहे. गावातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन केले जात नाही. आजूबाजूच्या गावांमधून विविध गोष्टींच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठेत येतात. यामुळे गावात गर्दीचे प्रमाण वाढते यातूनच गावातील बाधीत रुग्णांचा आकडा वाढत आहे. प्रशासनाने विविध नियम घातलेले असताना देखील सर्रासपणे सर्व नियम पायदळी तुडवत परवानगी नसलेली दुकाने गुपचूपपणे चालू ठेवली जातात.

याबाबत आज यवत ग्रामस्तरीय समितीची बैठक यवत ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष व यवतचे सरपंच समीर दोरगे, सहअध्यक्ष व तलाठी कैलास भाटे, सचिव राजाराम शेंडगे आदी सदस्य उपस्थित होते.

बैठकीत गावातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढता धोका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यापुढे गावात ठोस उपाययोजना व कडक लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यवत गावात शुक्रवार (दि.१४) पासून मंगळवार (दि.२५) पर्यंत सलग ११ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जनता कर्फ्यूच्या काळात दवाखाने व मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असेल दूध विक्री केवळ घरपोच करता येणार असून सकाळी ७ ते ९ सायंकाळी ७ ते ८ घरपोच सेवा देता येणार आहे. कृषीविषयक दुकानांसाठी सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू ठेवता येणार आहे. यात हार्डवेअर दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. इतर कोणतीही दुकाने उघडण्यास कोणालाही परवानगी असणार नाही.

गुपचूप दुकाने उघडल्यास कोणाचीही हयगय करणार नाही : सरपंच समीर दोरगे

गावातील कोरोनाची साथ आटोक्यात येण्यासाठी ११ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय गावस्तरीय समितीने घेतला आहे. या काळात नियमांचे पालन न केल्यास संबंधित व्यापारी व नागरिकांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या काळात दुकाने उघडल्यास कसलीही हयगय न करता कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सरपंच समीर दोरगे यांनी दिला आहे.