शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

आचारसंहितेत भरतीप्रकिया

By admin | Updated: October 26, 2016 06:02 IST

महापालिका प्रशासनाने अभियंता भरतीसाठी सर्वाधिक जलद प्रक्रिया राबवून परीक्षा घेतली खरी, मात्र आता त्यानंतरची निवड यादी, कागदपत्र तपासणी अशी प्रक्रिया सुरू करण्याला निवडणूक

पुणे : महापालिका प्रशासनाने अभियंता भरतीसाठी सर्वाधिक जलद प्रक्रिया राबवून परीक्षा घेतली खरी, मात्र आता त्यानंतरची निवड यादी, कागदपत्र तपासणी अशी प्रक्रिया सुरू करण्याला निवडणूक आचारसंहितेचा खो बसला आहे. पालिका प्रशासन अत्यंत संथपणे ही प्रक्रिया राबवत असून, पात्र उमेदवारांना तर प्रत्यक्ष नियुक्तिपत्रे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच मिळतील.स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी अशा तीन विभागांत अभियंत्यांची भरती करण्यासाठी पालिका प्रशासनाने आॅनलाईन परीक्षा, आॅनलाईन निकाल अशा सगळ्या हायटेक प्रक्रियेचा अवलंब केला. तिन्ही विभागांतील मिळून एकूण २१८ जागांसाठी तब्बल २१ जणांनी पालिकेकडे आॅनलाईन अर्ज केले होते. स्वत: आयुक्त कुणाल कुमार यांनी या हायटेक प्रक्रियेत लक्ष घातले होते. पालिकेच्या संगणक विभागाचे प्रमुख राहुल जगताप तसेच आस्थापना विभागाचे उपायुक्त प्रकाश बोरसे यांनी त्यांना साह्य केले. पात्र उमेदवारांची यादी करून त्यांना परीक्षेसाठीची तारीख वगैरे सर्व आवश्यक गोष्टी आॅनलाईनच कळविण्यात आल्या. पात्र उमेदवारांनी परीक्षाही आॅनलाईनच द्यायची होती. त्यासाठीची सर्व तांत्रिक तयारी पालिकेने पूर्ण केली.प्रशासन त्यानंतर गुणांच्या प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करीत होते, त्याच दरम्यान महापालिकेच्या निवडणूक आचारसंहितेची घोषणा झाली. त्यानंतर हे सगळे कामच ठप्पझाले. परीक्षेला बसलेल्यांपैकी एकूण किती उमेदवारांना ९०पेक्षा जास्त गुण मिळाले याचीसुद्धा एकत्रित माहिती प्रशासनाकडे आता तयार नाही. स्थापत्यसाठी २ हजार ४१८, विद्युतसाठी १ हजार २९१ व यांत्रिकीसाठी १ हजार ५०९ उमेदवार पात्र ठरले असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यालाही अधिकृत दुजोरा मिळाला नाही.ही यादी, त्यानंतर आरक्षणनिहाय तयार करावी लागणारी गुणवत्तानिहाय यादी, त्यानुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी, त्याचे एका पदासाठी ५ उमेदवारांचे प्रमाण असे बरेच काम यावर करावे लागणार आहे. मात्र ते काम जवळपास थांबल्यात जमा आहे. आता बहुधा निवडणूक झाल्यावरच ते सुरू होईल. तसेच पात्र उमेदवारांची मुलाखत व त्यानंतर त्यांना नियुक्तिपत्र या प्रक्रियेलाही निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरचाच मुहूर्त मिळणार आहे.१८ हजार जणांनी दिली परीक्षाएकूण अर्जदारांपैकी १८ हजार जणांनी आॅनलाईन परीक्षा दिली. २००पैकी ९० गुण असलेल्यांना पात्र समजण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांनी उत्तरपत्रिका आॅन लाईन सबमीट केली की अवघ्या दोन तासांत त्याचा निकाल आॅनलाईनच टाकला जात होता. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत कसलाही हस्तक्षेप करायला कोणाला कसली संधीच मिळाली नाही. तत्काळ निकाल कळत असल्यामुळे उमेदवारांनाही काय झाले ते समजत होते. तिन्ही विभागांसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका होत्या. त्या तपासण्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा ठेवण्यात आली होती.काम थांबलेले नाही. प्रशासन यादी तयार करते आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे आता लगेच ही प्रक्रिया राबवण्याला मर्यादा आल्या आहेत. या वेळी प्रतीक्षायादीही तयार करण्यात येणार आहे. आचारसंहितेबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागितले आहे.प्रकाश बोरसे, उपायुक्त, आस्थापना विभाग