शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मोबाइल कंपन्यांना मुदतवाढीसाठी परस्पर बदलले नियम

By admin | Updated: December 8, 2015 00:16 IST

मोबाइल कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे खोदाई केल्याचे प्रकरण ताजे असतानाच महापालिका प्रशासनाने मोबाइल कंपन्यांना खोदाईसाठी मुदतवाढ देताना अटी

पुणे : मोबाइल कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे खोदाई केल्याचे प्रकरण ताजे असतानाच महापालिका प्रशासनाने मोबाइल कंपन्यांना खोदाईसाठी मुदतवाढ देताना अटी व शर्तीमध्ये परस्पर फेरफार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. खोदाईची माहिती वर्तमानपत्रातून जाहिरातीद्वारे देण्याची अटच प्रशासनाने काढून टाकली आहे, त्यामुळे शहरात कुठे कुठे खोदाईच्या कामांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे, याची माहितीच नागरिकांना मिळू शकणार नाही.शहरातील विविध ४६ भागांमध्ये ३९ हजार ७० मीटरची खोदाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरात रिलायन्स कंपनीकडून ४ जी लाइन टाकण्यासाठी मोठे काम सुरू आहे. रिलायन्स कंपनीला २१ नोव्हेंबर २०१४ रोजी २३ किलोमीटर खोदाईसाठी पहिल्यांदा परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर २४ डिसेंबर २०१४ रोजी ५८ किमी, २ फेब्रुवारी २०१५ रोजी १०३ किमी, २१ एप्रिल २०१५ रोजी ४० किमी खोदाईसाठी रिलायन्स कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. कंपनीने त्यांना दिलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्याने त्यांनी वारंवार मुदतवाढ घेतलेली आहे. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास कंपन्यांना पुन्हा नव्याने शुल्क आकारण्याची तरतूद नियमामध्ये आहे, मात्र त्यानुसार कार्यवाही केली जात नाही. याविरुद्ध युवक काँग्रेसचे पदाधिकारी ऋषी बालगुडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे.मोबाइल कंपन्यांना मुदतवाढ देताना नियमांमध्ये परस्पर बदल केल्याचे उजेडात आले आहे. खोदाईचे काम सुरू करताना लोकांना त्याची माहिती व्हावी, याकरिता वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस देणे बंधनकारक आहे, जाहीर नोटीस न देता काम सुरू केल्यास ते अनधिकृत समजण्यात येईल, अशी अट होती. मोबाइल कंपन्यांच्या कामांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देताना महापालिका प्रशासनाने परस्पर ही अटच काढून टाकली आहे. यामुळे खोदाईचे काम कुठे सुरू आहे, याची माहिती नागरिकांना समजू शकणार नाही. (प्रतिनिधी)