शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

प्रस्ताव दाखल करूनही टँकर मिळेना

By admin | Updated: April 15, 2016 03:35 IST

जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. डिंभे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने टंचाईपासून दिलासा मिळाला असला तरी आजही जिल्ह्यात अनेक भागांत नागरिकांना

पुणे : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. डिंभे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने टंचाईपासून दिलासा मिळाला असला तरी आजही जिल्ह्यात अनेक भागांत नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवले जात आहे. अनेक तालुक्यांनी तहसील तसेच प्रांत कार्यालयात टँकरचे प्रस्ताव दाखल केले आहे. मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळत नसल्याने टँकर सुरू होऊ शकले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. यामुळे डिंभे धरणातून पिण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्यात आले. यामुळे काहीसा दिलासा जरी मिळाला असला, तरी जिल्ह्याच्या अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पायपीट थांबावी यासाठी तहसील कार्यालयात टँकरचा प्रस्ताव दाखल होत आहे. टँकर मंजुरीचे सर्व अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना असल्यामुळे या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास विलंब लागत आहे. पुरंदर, बारामती, दौंड, भोर तालुक्यांतून टँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयात गेले आहे. दौंड तालुक्यात २० टँकरचे प्रस्ताव होते. हे सर्व प्रस्ताव मंजूर झाले आहे. इंदापूर तालुक्यातील १७ गावे आणि वाड्यांनाही २० टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. जवळपास १९ हजार २६३ अशा ५३ हजार ३६७ ग्रामस्थ या पाण्यावर अवलंबून आहे. आणखी ९ गावांचे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवण्यात आले आहे. भोर तालुक्यातील गावांत तीव्र पाणीटंचाई झाली असून, १२ गावे व २२ वाड्यावस्त्यांनी टँकरचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले आहेत. त्यापैकी फ क्त तीन गावे व चार वाड्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी एकाही टँकरच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. दोन्ही धरणभागात, महुडे आणि विसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई सुरूअसून, त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. जुन्नर तालुक्यातील ५ गावे व ६६ वाड्यावस्त्यांना ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दिली. तर पुरंदर तालुक्यातील २ गावठाणे व ९६ वाड्यावस्त्यांवरील सुमारे २३ हजार ४०२ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खेड तालुक्यात मागण्यांचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. कनेरसर, साबुर्डी, वाशेरे, वेताळे, आव्हाट, कुरकुंडी या गावांच्या वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव खेड पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत.गेल्या वर्षी शासकीय ५ आणि खासगी २ अशा ७ टँकरने या वाड्यावस्त्यांना पाणी पुरविले होते. हे टँकर गेल्या वर्षी १० मेनंतर सुरू झाले होते. पंचायत समितीने वाशेरे, साबुर्डी आणि जऊळके खुर्दसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव दिले आहेत.टँकरपुढे पाण्याचा प्रश्नदौंड तालुक्यात २० टँकर सुरू आहेत; परंतु या २० टँकरला पाणी भरायचे कोठून? असाही प्रश्न निर्माण होत असल्याने टँकरग्रस्त काही गावांत टॅँकर असूनदेखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, काही सेवाभावी संस्था खासगी विहिरीतून काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करत असल्याची वस्तुस्थिती आहे.पाणीपुरवठा सुरळीतखोर आणि परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी टँकरने सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरू आहे. वरवंड तलावातून पाणी पिंपळाचीवाडी येथील टाकीत घेतले जाते. त्या टाकीतील पाणीपुरवठा टँकरद्वारे परिसराला होत आहे. - रामचंद्र चौधरीसरपंच, खोर