शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

जन्म-मृत्यू नोंदीसाठीचे हेलपाटे वाचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST

निलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जन्म-मृत्यूचे दाखले हे क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय येथे केवळ जन्म-मृत्यू कागदपत्रांची मुख्य ...

निलेश राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जन्म-मृत्यूचे दाखले हे क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय येथे केवळ जन्म-मृत्यू कागदपत्रांची मुख्य संगणकीय नोंदणी न झाल्याने, वारंवार खेटा घालूनही महिनोंमहिने नागरिकांना मिळत नव्हते. पण आता ही तक्रार यापुढे कमी होणार आहे. कारण, महापालिकेने जन्म-मृत्यू घटनांच्या मुख्य नोंदीच (केंद्र शासनाने अंगिकृत केलेल्या नागरी नोंदणी पध्दतीत) क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एकाच ठिकाणी नोंदी व तेथूनच दाखले वितरण ही नवी पद्धती शुक्रवारपासून (दि. ११) अंमलात येणार आहे.

शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमधील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांनाच महापालिकेने ‘उपनिबंधक, जन्म-मृत्यू’ नोंदणीचे कामकाज करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे रुग्णालयातून मिळणारी जन्म-मृत्यू संदर्भातील कागदपत्रे घेऊन, कसबा पेठेतील मुख्य कार्यालय अथवा परिमंडळ कार्यालयाकडे जाण्याची आवश्यकताच भासणार नाही. परिणामी कागदपत्रे पोहोचली का, नोंदणी झाली की नाही, झाली असेल, तर ती क्षेत्रीय कार्यालयात आली आहे का, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहेत.

नव्या निर्णयानुसार रुग्णालयातून आलेल्या जन्म-मृत्यूच्या घटनांच्या मुख्य नोंदी क्षेत्रीय कार्यालय स्तरावरच क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करून, तेथून लागलीच नागरिकांना दाखले द्यावेत, असा आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी गुरुवारी दिले. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जन्म-मृत्यू घटनांच्या नोंदी करणे, जन्म दाखल्यात बाळाचे नाव समाविष्ट करणे, जन्म व मृत्यू दाखल्यांमध्ये कायदेशीर बाबीनुसार किरकोळ दुरुस्त्या करणे, जन्म व मृत्यू दाखल्यांबाबत न्यायालयीन कामकाज/दावे आदी प्रकरणांमध्ये उपस्थित राहणे तसेच जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९-२००० अंतर्गत सर्व कामकाज करण्याचे अधिकार क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

चौकट

दोघेच होते फक्त

यापूर्वी महापालिकेकडे ‘उपनिबंधक, जन्म-मृत्यू’ नोंदणीचे कामकाज करणारे केवळ दोन अधिकारी होते आता हे अधिकार सर्व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाल्याने नोंदी वेळेत होण्याची अपेक्षा आहे. प्राप्त झाले आहेत़

चौकट

अशी होती पूर्वीची जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रिया

जन्म-मृत्यूच्या वर्दी संबंधित रुग्णालयांकडून, नातेवाईकांकडून प्रथम क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जमा होत असे. तेथून ही माहिती कसबा पेठेतील मुख्य जन्म-मृत्यू कार्यालयात जाई. तेथे ती संगणकीय प्रणालीत नोंदवली जायची. त्यानंतर नोंदणी क्रमांक संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाठविला जात असे. त्यानंतरच क्षेत्रीय कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रातून नागरिकांना जन्म अथवा मृत्यूचे दाखले मिळत. डिसेंबर २०२० मध्ये मुख्य कार्यालयाबरोबरच जन्म-मृत्यू घटनांच्या नोंदींचे अधिकार हे परिमंडळ विभागांनाही दिले. यातही विलंब होऊ लागल्याने नव्या आदेशानुसार आता ‘रुग्णालय ते क्षेत्रीय कार्यालय व थेट नागरिक’ अशी प्रक्रिया सुलभ केल्याचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय प्रमुख तथा सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

रुग्णालयांकडून सहकार्याची अपेक्षा़

जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यानुसार जन्म-मृत्यूच्या घटनांची आवश्यक कागदपत्रांसह माहिती ही रुग्णालयांनी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांना २१ दिवसांच्या आतमध्ये द्यायची असते. अनेक रुग्णालये ही दहा-वीस घटनांची माहिती गोळा सादर करतात. त्यामुळे एखादी घटना १ तारखेला घडली तरी त्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयांकडे २१ दिवसांपर्यंत येऊ शकते व त्यानंतर पाठविलेली माहिती किरकोळ दंड आकारून स्वीकारली जाते. आता क्षेत्रीय कार्यालयांनाच नोंदीचे अधिकार दिल्याने, रुग्णालयांनी जन्म-मृत्यूच्या घटनांची माहिती लागलीच क्षेत्रीय कार्यालयांना दिली तर, नागरिकांना लवकरात लवकर दाखले मिळू शकतील. रुग्णालयांनी जन्म-मृत्यूच्या घटनांची माहिती क्षेत्रीय कार्यालयांकडे तत्काळ सादर करावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

चौकट

“नागरिकांना कमीत कमी वेळेत जन्म व मृत्यूचे दाखले मिळण्याकरिता, जन्म-मृत्यू नोंदीचे अधिकार क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. दाखले मिळण्यासाठीच्या कार्यालयीन प्रक्रियेतला मोठा कालावधी यामुळे वाचणार आहे.”

रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

----------------------------