शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

लॉकडाऊन नको बाबत प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST

--------------------------------------------------------- जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत हा देश आहे. त्यामुळे जगातील लॉकडाऊनची तुलना भारताबरोबर होऊ शकत नाही. सर्वांना ...

---------------------------------------------------------

जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत हा देश आहे. त्यामुळे जगातील लॉकडाऊनची तुलना भारताबरोबर होऊ शकत नाही. सर्वांना कामाची आवश्यकता आहे. व्यवसाय, अर्थचक्र रोजीरोटी चालली पाहिजे. त्याचबरोबर कोरोनाशी मुकाबला करता आला पाहिजे. यासाठी २४ तास सर्व उपक्रम, पब्लिक ट्रान्सपोर्टसहित चालू ठेवल्यास गर्दी राहणार नाही. कोणालाही कोणत्याही वेळेस गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सचे पालन करत काम करता येईल. व्यवसाय करता येईल. यासाठी सर्वांना थोडे जास्त कष्ट करावे लागतील. असे झाल्यास अर्थचक्र चालू राहील आणि कोरोनाशी मुकाबलाही करता येईल. संबंधितांनी याचाही विचार करावा. - दादा गुजर, व्यावसायिक

------------------------------------------------------------------------------------------------------

लॉकडाऊनबाबत सरकारलाच निर्णय करता येत नाहीये. वैद्यकीय क्षेत्रालाही कोरोनाबद्दल नीट सांगता येत नाही. कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याचा फॉर्म्युला कोणत्याच देशाला सापडलेला दिसत नाही. सरकारची जशी ओढाताण होत आहे तशीच निर्णय घेताना नागरिकांची देखील ओढाताण होत आहे. मात्र याचा विचार केला जात नाही. नुसतंच सरकार नागरिकांना पथ्य पाळत नाही म्हणत आहे. पण मुळातच कोरोनावर अजूनही गुणकारी औषध सापडलेले नाही. फक्त लस आपण शोधली आहे. पण नव संकट आलय की कोरोनाचं रूप बदलत आहे. नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असेल तर सर्व बाजू नागरिकांंना व्यवस्थित समजून सांगितल्या पाहिजेत. यातच इतके संकट आले असूनही, राजकारणी एकमेकांना दूषणे देत आहेत याचं दु:ख वाटते. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेची मानसिकता तयारी केली पाहिजे. सरकार आणि शास्त्रज्ञांनी आपल्या मर्यादा सांगितल्या पाहिजेत. - डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते