शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:10 IST

- राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघ -- राज्य सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय हा अनपेक्षित आहे. ...

- राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघ

--

राज्य सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय हा अनपेक्षित आहे. मागील युती सरकारच्या काळातील कायदेतज्ञांच्या जोडीने नवीन तज्ञ वकिलांची फौज न्यायालयात उभी केली. अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे असतानाही मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार न होणे. हे एक कोड आहे. विरोधकांनी कोरोना परिस्थितीत याचे राजकारण करू नये.

- अक्षय जैन, सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

--

राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे. या विषयावर राजकारण न करता, मराठा आरक्षणाला मान्यता मिळावी व राज्यातील कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ नये.

- ऋषी परदेशी, निरीक्षक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र राज्य

--

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समनव्याचा अभाव आणि अकार्यक्षम वृत्तीमुळे हे आरक्षण रद्द झाले. राज्यातील तरुणांच्या उज्जवल भविष्यासाठी आणि मराठा तरुणांना त्यांच्या आरक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी योग्य कार्यवाही होणे गरजेचे आहे. कायदेशीर तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास करून किमान आता तरी राज्य सरकारने गंभीरपणे या प्रश्नाचा विचार करावा. अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू

- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

--

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले, हा मराठ्यांसाठी काळा दिवस आहे. देशातील २१ राज्यात ५० टक्क्यांच्यावर आरक्षण असताना केवळ मराठा आणि महाराष्ट्रातच आरक्षण रद्द करणे हा मराठा समाजावर व महाराष्ट्रावर अन्याय आहे. भविष्यात मराठा समाजाला राज्यकर्त्यांनी गृहीत धरु नये. सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. मराठा समाजाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये.

- युवराज दिसले, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा

--

गेली ३५/४० वर्षे मराठा समाजाने केलेल्या संघर्षावर आज पाणी फिरले. त्या दृष्टीने आजचा दिवस हा मराठा समाजासाठी काळा दिवस म्हणावा लागेल. या निकालाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. सरकारमध्ये एक मराठाविरोधी लॉबी कार्यरत असून या लॉबीच्या काळ्या कारस्थानामुळेच मराठा समाजाचा घात झाला.

- तुषार काकडे, प्रदेश प्रवक्ता, शिवसंग्राम

--

न्यायालयाने दिलेला निर्णय मराठा समाजातील तरुणांसाठी दुर्दैवी असून त्याचा समाजातील तरुणांच्या शिक्षण व नोकरीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने विविध योजना व उपक्रम राबवून मराठा समाजातील तरुणांना विविध संधी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आरक्षण मिळेपर्यंत न्यायालयीन लढाई सुरू ठेवावी.

- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंट राईट्स