शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:10 IST

- राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघ -- राज्य सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय हा अनपेक्षित आहे. ...

- राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघ

--

राज्य सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय हा अनपेक्षित आहे. मागील युती सरकारच्या काळातील कायदेतज्ञांच्या जोडीने नवीन तज्ञ वकिलांची फौज न्यायालयात उभी केली. अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे असतानाही मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार न होणे. हे एक कोड आहे. विरोधकांनी कोरोना परिस्थितीत याचे राजकारण करू नये.

- अक्षय जैन, सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

--

राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे. या विषयावर राजकारण न करता, मराठा आरक्षणाला मान्यता मिळावी व राज्यातील कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ नये.

- ऋषी परदेशी, निरीक्षक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र राज्य

--

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समनव्याचा अभाव आणि अकार्यक्षम वृत्तीमुळे हे आरक्षण रद्द झाले. राज्यातील तरुणांच्या उज्जवल भविष्यासाठी आणि मराठा तरुणांना त्यांच्या आरक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी योग्य कार्यवाही होणे गरजेचे आहे. कायदेशीर तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास करून किमान आता तरी राज्य सरकारने गंभीरपणे या प्रश्नाचा विचार करावा. अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू

- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

--

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले, हा मराठ्यांसाठी काळा दिवस आहे. देशातील २१ राज्यात ५० टक्क्यांच्यावर आरक्षण असताना केवळ मराठा आणि महाराष्ट्रातच आरक्षण रद्द करणे हा मराठा समाजावर व महाराष्ट्रावर अन्याय आहे. भविष्यात मराठा समाजाला राज्यकर्त्यांनी गृहीत धरु नये. सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. मराठा समाजाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये.

- युवराज दिसले, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा

--

गेली ३५/४० वर्षे मराठा समाजाने केलेल्या संघर्षावर आज पाणी फिरले. त्या दृष्टीने आजचा दिवस हा मराठा समाजासाठी काळा दिवस म्हणावा लागेल. या निकालाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. सरकारमध्ये एक मराठाविरोधी लॉबी कार्यरत असून या लॉबीच्या काळ्या कारस्थानामुळेच मराठा समाजाचा घात झाला.

- तुषार काकडे, प्रदेश प्रवक्ता, शिवसंग्राम

--

न्यायालयाने दिलेला निर्णय मराठा समाजातील तरुणांसाठी दुर्दैवी असून त्याचा समाजातील तरुणांच्या शिक्षण व नोकरीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने विविध योजना व उपक्रम राबवून मराठा समाजातील तरुणांना विविध संधी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आरक्षण मिळेपर्यंत न्यायालयीन लढाई सुरू ठेवावी.

- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंट राईट्स