शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आत्महत्येचं टोक गाठण्यापूर्वी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:28 IST

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण ...

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण होतो आहे. ताणतणावातून उच्चपदस्थ व्यक्ती, सेलिब्रिटी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलतात. सामान्य माणसांमध्येही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचे धाडस वाढते आहे. ‘आयुष्य स्वस्त नाही, सुंदर आहे’ हे विविध माध्यमांमधून समाजमनावर बिंबवणे गरजेचे आहे,” असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अलीकडच्या काळात सुशांत सिंह राजपूत, भैय्यू महाराज, डॉ. शितल आमटे, अशा प्रसिद्ध व्यक्तींनी उचललेले आत्महत्येचे पाऊल धक्कादायक ठरले. यापैकी प्रत्येकाला मोठा अनुयायी वर्ग आहे. या अनुयायांवरही त्यांच्या आत्महत्येसारख्या कृत्यांचा परिणाम होतो का, असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अर्पिता जोशी म्हणाल्या की, आपल्या मनावर ताण आल्यास त्यातून बाहेर पडण्याची गरज असते. जवळच्या लोकांशी संवाद गरजेचा आहेच; मात्र, एखादी गोष्ट कोणाशीच शेअर करता न आल्यास घुसमट होते. अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात काहीच गैर नाही. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याबाबतचा ‘टॅबू’ अजूनही कमी झालेला नाही. मात्र, लोकांना काय वाटते यापेक्षा आपली गरज काय आहे, हे जास्त महत्वाचे आहे. विविध थेरपी आणि औषधोपचारांच्या माध्यमातून नैराश्यावर नक्कीच मात करता येते.

चौकट

“गरजा वाढतात आणि पैसा कमी पडतो. प्रतिष्ठेचे मुखवटे समाजाला दाखवण्याच्या अट्टहासातून ताण निर्माण होतो. संतुलन साधता न आल्यास मानसिक अस्वस्थता येते, आत्मविश्वास कमी होतो. नैराश्याचे रुपांतर आत्महत्येच्या निर्णयात होते. वैयक्तिक गरजा, सामाजिक गरजा, अस्तित्वाची ओळख आणि नेतृत्व या चार पातळयांवर आपले मानसिक द्वंद्व सुरु होते. तुलना न करणे, स्वत:साठी जगण्याची गरज, मानसिक संतुलन गरजेचे आहे. पैसा हे माध्यम आहे, ध्येय नाही. आपल्या आयुष्यावर केवळ आपलाच हक्क आहे, हे स्वत:ला बजावता आले पाहिजे.”

- डॉ. पांडुरंग कदम, एमएस, सायकोथेरपिस्ट