शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आत्महत्येचं टोक गाठण्यापूर्वी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:28 IST

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण ...

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण होतो आहे. ताणतणावातून उच्चपदस्थ व्यक्ती, सेलिब्रिटी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलतात. सामान्य माणसांमध्येही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचे धाडस वाढते आहे. ‘आयुष्य स्वस्त नाही, सुंदर आहे’ हे विविध माध्यमांमधून समाजमनावर बिंबवणे गरजेचे आहे,” असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अलीकडच्या काळात सुशांत सिंह राजपूत, भैय्यू महाराज, डॉ. शितल आमटे, अशा प्रसिद्ध व्यक्तींनी उचललेले आत्महत्येचे पाऊल धक्कादायक ठरले. यापैकी प्रत्येकाला मोठा अनुयायी वर्ग आहे. या अनुयायांवरही त्यांच्या आत्महत्येसारख्या कृत्यांचा परिणाम होतो का, असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अर्पिता जोशी म्हणाल्या की, आपल्या मनावर ताण आल्यास त्यातून बाहेर पडण्याची गरज असते. जवळच्या लोकांशी संवाद गरजेचा आहेच; मात्र, एखादी गोष्ट कोणाशीच शेअर करता न आल्यास घुसमट होते. अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात काहीच गैर नाही. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याबाबतचा ‘टॅबू’ अजूनही कमी झालेला नाही. मात्र, लोकांना काय वाटते यापेक्षा आपली गरज काय आहे, हे जास्त महत्वाचे आहे. विविध थेरपी आणि औषधोपचारांच्या माध्यमातून नैराश्यावर नक्कीच मात करता येते.

चौकट

“गरजा वाढतात आणि पैसा कमी पडतो. प्रतिष्ठेचे मुखवटे समाजाला दाखवण्याच्या अट्टहासातून ताण निर्माण होतो. संतुलन साधता न आल्यास मानसिक अस्वस्थता येते, आत्मविश्वास कमी होतो. नैराश्याचे रुपांतर आत्महत्येच्या निर्णयात होते. वैयक्तिक गरजा, सामाजिक गरजा, अस्तित्वाची ओळख आणि नेतृत्व या चार पातळयांवर आपले मानसिक द्वंद्व सुरु होते. तुलना न करणे, स्वत:साठी जगण्याची गरज, मानसिक संतुलन गरजेचे आहे. पैसा हे माध्यम आहे, ध्येय नाही. आपल्या आयुष्यावर केवळ आपलाच हक्क आहे, हे स्वत:ला बजावता आले पाहिजे.”

- डॉ. पांडुरंग कदम, एमएस, सायकोथेरपिस्ट