शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शेंडगेवाडी तलावाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:11 IST

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील पिंपळदरा ओढा परिसरातील शेतकरी वर्गाला भीषण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. ...

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील पिंपळदरा ओढा परिसरातील शेतकरी वर्गाला भीषण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. या भागातील शेंडगेवाडी तलाव आटल्याने विहिरी आणि बोअरवेलचीही पाणी पातळी घटली आहे. यामुळे शेतीसह या भागातील शेळ्या, मेंढ्या यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात शेतकऱ्यांनी ऊस, कांदा यासारखी पिके घेतली आहे. परंतु, हा तलाव आमदार अशोक पवार यानी एक वर्षापूर्वी चासकमान आवर्तन सोडून भरला होता. परंतु, त्यानंतर या तलावात पाणी न सोडल्याने या भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत.

आलेगाव पागा परिसरातील शेतकरी यांच्या सातबारावर चासकमान भू संपादन राखीव असा शेरा पडलेला असूनही या भागातील शेतकरी हा चासकमान पाणी आवर्तनपासून वंचित आहे. त्यामुळे या तलावात पाणी सोडल्यास या भागातील व ओढ्याजवळील विहिरी, बोअरवेल यांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. त्यामुळे शेंडगेवाडी तलाव चासकमान आवर्तन सोडून भरावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

फोटो :