शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

ऐन दुष्काळात रावणगावची भागवली तहान

By admin | Updated: March 23, 2016 01:11 IST

स्वत:चा पाच एकर ऊस जळून चाललेला असताना एक सामाजिक दायित्व म्हणून संजय गजीनाथ आटोळे व भगवान गजीनाथ आटोळे या बंधूंनी स्वत:च्या मालकीची बोअरवेल देऊन रावणगावकरां

राजेगाव : स्वत:चा पाच एकर ऊस जळून चाललेला असताना एक सामाजिक दायित्व म्हणून संजय गजीनाथ आटोळे व भगवान गजीनाथ आटोळे या बंधूंनी स्वत:च्या मालकीची बोअरवेल देऊन रावणगावकरांची ऐन दुष्काळात तहान भागवली आहे. आटोळे बंधूंच्या या दानशूरपणाचे कौतुक सर्वत्र होत आहे. खडकवासला कॅनॉलचे पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले आवर्तनाचे पाणी रावणगावला मिळाले नसल्याने, विहिरी, कूपनलिका हे जलस्रोत आटले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ रावणगावकरांवर आली होती. गावाला १० दिवसांपूर्वी पाण्याचा टॅँकर सुरू केला होता. परंतु एका दिवसात फक्त टॅँकरच्या तीनच खेपा होत असल्याने गावाला पाणी पुरत नव्हते. आटोळे बंधूंनी २० दिवसांपूर्वी स्वत:चा ५ एकर ऊस जळू लागल्याने बोअर घेतला. त्याला पाणीही लागले; परंतु सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी स्वत:च्या जळालेल्या उसाला पाणी देण्याऐवजी गावाला पाणी दिले. त्यांच्या बोअरवेलपासून सहाशे फूट अंतरावर असलेल्या गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत २४ तास पाणी टाकले जात आहे. येथून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. उपसरपंच गेनदेव आटोळे म्हणाले, की आटोळे बंधूंनी गावासाठी जी सहानुभूती दाखवली आहे त्याचे मोल करता येणार नाही. त्यांनी दाखविलेल्या औदार्यामुळे गावठाणातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे. गावाला सध्या एकच टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तोही टॅँकर वरवंडहून भरून येत असल्याने दिवसाला फक्त तीनच खेपा होतात.आणखी एक टॅँकरची मागणी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे ग्रामपंचायतीने केली आहे.