शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारच हिरावून घेतायत गरिबांच्या तोंडचा घास

By admin | Updated: March 28, 2016 03:13 IST

दारिद्र्यरेषेखाली लोकांना किमान दोन वेळचे अन्न मिळावे याकरिता दोन रुपये किलोने गहू, तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य देण्यास

पुणे : दारिद्र्यरेषेखाली लोकांना किमान दोन वेळचे अन्न मिळावे याकरिता दोन रुपये किलोने गहू, तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य देण्यास वेगवेगळी कारणे सांगून रेशन दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे उजेडात आले आहे. त्याचबरोबर अन्नसुरक्षा योजनेच्या यादीत अनेक दुबार व बोगस नावे टाकून मोठ्या प्रमाणात धान्य लाटले जात असल्याचे दिसून आले आहे.केंद्रामध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी २ फेब्रुवारी २०१४ पासून अन्नसुरक्षा योजना कार्यान्वित केली. याअंतर्गत शहरातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५९ हजारपर्यंत आहे, त्यांचा या योजनेत लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दारिद्र्यरेषेखालील ४ लाख कुटुंबांचा यामध्ये समावेश झाला आहे. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना मोलमजुरी करणाऱ्या, अत्यंत हलाखीचे आयुष्य जगणाऱ्या, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, प्रत्यक्षात या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अन्नसुरक्षा योजनेचे धान्य घ्यायला रेशन दुकानांमध्ये गेल्यास आता फक्त तुमच्याकडे गॅस आहे, मग धान्य मिळणार नाही...मालच आला नाही...आता फक्त गहूच आलाय... तांदूळ संपलाय... माल कमी आलाय... पुढच्या महिन्यात या अशी वेगवेगळी कारणे सांगून धान्य देण्यास रेशन दुकानदारांकडून नकार दिला जातो. प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात निम्मेच धान्य दुकानदारांकडून दिले जाते, असे या योजनेतील लाभार्थी फईमा पठाण यांनी सांगितले.अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची यादी लोकहित फाउंडेशनचे अजहर खान यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळविली. त्यामध्ये अनेक दुबार व बोगस लाभार्थींची नावे समाविष्ट असल्याचे दिसून आले. त्यातील काही नावे सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचीही होती. दुबार व बोगस लाभार्थ्यांच्या नावावरील धान्य रेशन दुकारांदाराकडून परस्पर लाटले जाते. त्यांनी किमान गरजू लाभार्थींना तरी नियमाप्रमाणे योग्य धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अजहर खान यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत २ रुपये किलोने मिळणारे गहू, तांदूळ नंतर काळ्या बाजारामध्ये त्याची १५ रुपये किलोने विक्री केली जाते, असा आरोप खान यांनी केला आहे. (प्रतिनिधी)गरजूंपर्यंत धान्य पोहोचविण्यात अपयशशहरामध्ये फुटपाथवर, नदीच्या काठावर राहणारे तसेच हलाखीचे जीवन जगत असलेली अनेक कुटुंबे आहेत. अन्नसुरक्षा योजनेतील धान्याची खरी गरज या कुटुंबीयांना आहे. मात्र त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांच्यापर्यंत ही योजनाच पोहोचू शकलेली नाही. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भटक्या कुटुंबांना तात्पुरते रेशनकार्ड देऊन धान्य देण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यामध्ये फार यश आलेले नाही. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीत एका नगरसेवकाच्या आईचे, रेशनदुकानदाराचे नाव असल्याचे माहिती अधिकारांतर्गत उजेडात आले आहे. वार्षिक उत्पन्न ५९ हजारपेक्षा कमी असण्याची अट असतानाही अशा पद्धतीने अनेक बड्या लोकांची नावे यात समाविष्ट आहेत.