शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

बाळाच्या पोटातील ट्युमरची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

By admin | Updated: July 8, 2017 02:58 IST

महिला २६ आठवड्यांची गर्भवती असताना बाळाच्या पोटात ट्युमर असल्याचे लक्षात आले. या धक्क्याने पती-पत्नी घाबरले होते. मात्र, डॉक्टरांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महिला २६ आठवड्यांची गर्भवती असताना बाळाच्या पोटात ट्युमर असल्याचे लक्षात आले. या धक्क्याने पती-पत्नी घाबरले होते. मात्र, डॉक्टरांनी दिलासा दिला. प्रसूती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लॅप्रोस्कोपीच्या साह्याने बाळाच्या पोटातील ट्युमर यशस्वीरीत्या काढण्यात आला... जहांगीर रुग्णालयात पुण्यातील ही पहिलीच दुर्मिळ शस्त्रकिया नुकतीच पार पडली. बालरोगतज्ज्ञ डॉ. दसमीतसिंग आणि भूलतज्ज्ञ डॉ. समीर भोसले यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.वडगावशेरी येथील २४ वर्षीय महिला गर्भवती होती. गर्भधारणेच्या २६व्या आठवड्यात केलेल्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या पोटात ट्युमर असल्याचे लक्षात आले. गर्भलिंगनिदान कायद्यानुसार, विसाव्या आठवड्यानंतर गर्भपात शक्य नसल्याने, आता काय होणार, असा प्रश्न पती-पत्नींसमोर उभा राहिला होता. प्रसूतीनंतर बाळाच्या पोटातील ट्युमर काढता येऊ शकतो, याबाबत डॉक्टरांनी दाम्पत्याला दिलासा दिला. १४ जून रोजी महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. १५ जून रोजी लॅप्रोस्कोपी करून बाळाच्या पोटातील ५ सेंटिमीटरचा ट्युमर पोटात हवा भरून काढण्यात आला. ट्युमर अंडाशयाला चिकटलेला असल्याने एक अंडाशय काढून टाकण्यात आले. ही शस्त्रक्रिया दीड-दोन तास चालली. नवजात बालकाला भूल देणे जोखमीचे असते. मात्र, डॉ. भोसले यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेसाठी अद्ययावत उपकरणांचा वापर करण्यात आला. नवजात बालकावर शस्त्रक्रिया करायची असल्याने ३-५ एमएमचा छोटा पोर्ट करण्यात आला. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, ‘‘प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत बाळाला भूल देणे जोखमीचे असते. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. अद्ययावत उपकरणांचा वापर करून शस्त्रक्रिया पार पाडता आल्याचे समाधान वाटते. अशा प्रकारची पुण्यातील ही पहिलीची शस्त्रक्रिया आहे. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर असून २० जूनला आई आणि बाळाला घरी सोडण्यात आले.’’डॉ. दसमीतसिंग म्हणाले, ‘‘ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आम्ही वैद्यकीय संशोधनाचा, साहित्याचा सखोल अभ्यास केला. ट्युमर अंडाशयाला जोडला गेलेला असल्याने आतड्यावर दाब निर्माण होण्याची भीती होती. बाळाचा जन्म झाल्यानंतर तपासणी केल्यावर ट्युमरमुळे आतड्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे लक्षात आले. जन्मानंतर दोन-तीन दिवस वाट पाहिली असती, तर बाळाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे जन्मानंतर तातडीने दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली. भविष्यात बाळाच्या आरोग्याबाबत कोणतीही गुंतागुंत निर्माण होणार नाही.’’