शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

सुपे परिसरात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: July 29, 2014 03:39 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील बहुतांश गावांना सुप्यातून सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील बहुतांश गावांना सुप्यातून सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, सुपे तलाव कोरडा पडल्याने पाणीटंचाईचे संकट आणखीन तीव्र होणार आहे. येथील तलावांतर्गत असणाऱ्या विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे, तर येथील तलावात असणाऱ्या चांदगुडेवाडी नळपाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाणी नसल्याने टँकर भरण्याच्या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे परिसरातील गावांना टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. परिणामी, पाणीटंचाईचे संकट वाढले आहे. या परिसरातील बहुतांश गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. खडकवासला कालव्याद्वारे पाटस विभागात सध्या पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे या कालव्याचे पाणी वरवंड तलावात घेऊन शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे सुपे परिसरातील गावांचे पाझर तलाव भरण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत गट विकास अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केल्याची माहिती माजी सभापती पोपटराव पानसरे यांनी दिली. सुपे परिसरातील कुतवळवाडी, बोरकरवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, भोंडवेवाडी, बाबुर्डी, देऊळगाव रसाळ, मोरगावच्या वाड्या-वस्त्या आदी ठिकाणी सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर कारखेलचा टँकर मागणीचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे किमान सुपे तलाव टंचाईतून जनाईद्वारे भरल्यास या ठिकाणच्या विहिरीतून इतर गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार असल्याने याबाबत चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिल्याची माहिती गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी दिली. दरम्यान, खडकवासला, पाटस विभागाचे उपअभियंता व्ही. आर. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सध्या वरवंड तलावात १०० दशलक्ष घनफूट आणि दौंड नगर पालिकेच्या तलावात २५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. वरवंड तलावात सध्या १५० क्युसेसद्वारे पाणी येत असल्याची माहिती जनाई योजनेचे उपविभागीय अधिकारी आर. एन. सालगुडे यांनी दिली. त्यामुळे हा तलाव भरण्यास किमान आठ दिवस लागणार आहेत. त्यानंतर सुपे तलावात पाणी सोडण्याचे नियोजन असून, शिल्ल्क राहिलेल्या पाणीसाठ्यावर तलाव भरण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)