शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा गुगल, मायक्रोसॉफ्टसह अमेरिकी कंपन्यांना इशारा
2
Rishabh Pant Injury Update : पंत विकेटमागे दिसणार नाही; पण गरज पडल्यास तो बॅटिंग करेल! BCCI नं दिली माहिती
3
"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा
4
'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना
5
पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथ्या नंबरवर; भारतासाठी आनंदाची बातमी
6
रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
7
राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय! प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
8
IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार
9
“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; उच्चांकी स्तरावरुन मोठ्या प्रमाणात घसरले दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत
11
धक्कादायक! पत्नीने पतीची जीभ तोडून खाल्ली; रक्तही प्यायली, ऐकून पोलिसही चक्रावले...
12
Shravan Somvar 2025: सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
13
'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
14
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!
16
Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा
18
"हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, त्याने..."; कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण
19
गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द
20
बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी

पाऊस नसल्याने भातपीक धोक्यात

By admin | Updated: July 13, 2015 23:55 IST

पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, त्याचा सर्वांत मोठा फटका भातपिकाला बसला आहे. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी

घोडेगाव : पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, त्याचा सर्वांत मोठा फटका भातपिकाला बसला आहे. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भातरोपे टाकली होती; मात्र सध्या पाऊस नसल्याने ही रोपे पिवळी पडली असून, त्यामुळे पूर्ण भातपीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २ लाख २९८ लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे कृषी विभागाचे नियोजन आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात भात, बाजरी, भुईमूग, नाचणी, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. यात भाताचे ६२ हजार ३00 हेक्टर क्षेत्र आहे. भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील पश्चिम भागात पडत असलेल्या पावसामुळे येथे भात उत्पादकांना दिलासा मिळाला असून तेथील भात लावणी बऱ्यापैकी उरकत आली आहे. मात्र, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातील चित्र विदारक आहे.जून महिन्यात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी भातरोपे टाकली. लवकर पाऊस सुरू झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले; परंतु अचानक पाऊस गायब झाल्याने भाताची रोपे जळून जाऊ लागली आहेत. पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे वर्षातील एकमेव भात हे पीक धोक्यात आल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)