शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाऊस नसल्याने भातपीक धोक्यात

By admin | Updated: July 13, 2015 23:55 IST

पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, त्याचा सर्वांत मोठा फटका भातपिकाला बसला आहे. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी

घोडेगाव : पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, त्याचा सर्वांत मोठा फटका भातपिकाला बसला आहे. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भातरोपे टाकली होती; मात्र सध्या पाऊस नसल्याने ही रोपे पिवळी पडली असून, त्यामुळे पूर्ण भातपीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २ लाख २९८ लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे कृषी विभागाचे नियोजन आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात भात, बाजरी, भुईमूग, नाचणी, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. यात भाताचे ६२ हजार ३00 हेक्टर क्षेत्र आहे. भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील पश्चिम भागात पडत असलेल्या पावसामुळे येथे भात उत्पादकांना दिलासा मिळाला असून तेथील भात लावणी बऱ्यापैकी उरकत आली आहे. मात्र, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातील चित्र विदारक आहे.जून महिन्यात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी भातरोपे टाकली. लवकर पाऊस सुरू झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले; परंतु अचानक पाऊस गायब झाल्याने भाताची रोपे जळून जाऊ लागली आहेत. पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे वर्षातील एकमेव भात हे पीक धोक्यात आल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)