शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

राणी सईबाईंचे समाधिस्थळ पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST

मार्गासनी: राणी सईबाईंचे समाधिस्थळ पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करणार, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी ...

मार्गासनी: राणी सईबाईंचे समाधिस्थळ पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करणार, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले.

पाल येथे राणी सईबाईंच्या स्मृतिस्थळी स्मृतिदिन पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संजय निंबाळकर, शिवसेनेचे कुलदीप कोंडे, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष शंकर भुरुक, झुंजारराव मरळ यांचे वंशज प्रदीप मरळ, शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम, सचिन खोपडे, मावळा जवान संघटनेचे बाळासाहेब सणस, सरपंच गोरक्ष शिर्के आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, शूर वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या पोटी सईबाई राणीसाहेबांचा जन्म झाला होता. फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक घराणे होय. त्यांची सोयरिक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्त्वाचे मानले गेले.

एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार ज्यांची सय (आठवण) काढेल, त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजे शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते. तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते. सईबाई राणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी, गृहिणी, सचिव व प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना १९ वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब यांच्याबरोबर झाले होते. लग्नात राजे १० वर्षांचे, तर सईबाई राणीसाहेब सात वर्षांच्या होत्या. अशा या सईबाई राणींच्या समाधिस्थळाची दुरवस्था झाली आहे. परंतु एका वर्षातच हे समाधिस्थळ व्यवस्थित बांधून या स्थळाला पर्यटनाचा दर्जा देणार असल्याचे यावेळी निंबाळकर यांनी सांगितले

०५ मार्गासनी

पाल येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना रामराजे नाईक-निंबाळकर.